‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम मास्क न लावणाऱ्या 152 जणांवर कार्यवाही

22

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.12फेब्रुवारी):- जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असून शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत भर पडत आहे. त्याचे गाभीर्य ओळखून कोविड-19 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचा काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज धडक मोहिम राबवून शहरातील विविध ठिकाणी भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करुन आवाहन केले. यामोहिमेत त्याच्यासोबत उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखडें, नायब तहसिलदार मेहेंद्र आकराम, पोलिस निरिक्षक उत्तमराव जाधव, परिवहन नियंत्रक विभागाचे शेळके, महसूल व महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

नागरीक बिना मास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी धडक मोहिम राबवून मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. त्यात अकोला तहसिल कार्यालया येथे 63, बार्शीटाकळी येथे 14, मुर्तिजापूर येथे आठ, पातुर येथे चार, अकोट येथे 31, बाळापूर येथे 22, तर तेल्हारा येथे 10 असे एकूण 152 व्यक्तीकडून 30 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.