भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर यांनी कोव्हिडचे तंतोतंत नियमाचे पालन करून अनेक प्रश्नासाठी दि २३ मार्च ला धरणे आंदोलन बिलोली तहसिल समोर धरणे आंदोलन केले

    71

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9979631332

    बिलोली(दि.24मार्च):-अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने
    नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर काँ.अशोक घायाळे ,चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय शहिद दिनी दि २३ मार्च २०२१ रोजी
    बिलोली येथे गंगाधर वाघमारे, बालाजी होनपारखे,यांच्या शिष्टमंडळ सहित कार्यकर्त्यांनी जमीन हक्कासाठी व दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी धरणे आंदोलन संपन्न झाले.

    धरणे आंदोलन कोव्हिड संकटात व शासनाच्या नियमाचे पालन करून फक्त मोजकेच चार कार्यकर्ते तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.शिष्टमंडळ यांनी तहसिलदार साहेब यांना भेटून अनेक विषयांवर चर्चा करून खालील प्रश्नांची दखल घ्यावी नाहि घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

    1) दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणारे वेतनात दोनवेळा दुधाचा खर्च भागत नाही त्या एक हजार रूपये कसे जीवन जगतील त्यासाठी महागाईच्या काळात दरमहा दहा हजार रुपये दिले तर, त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील त्यांची हालअपेष्ठा थांबतील ते वेळेवर देण्यात यावे.
    2) शासकीय जमीन गायरान, मधुरा, सिलिंग, गावठाण, डोंगराळ, परमपुक, सिलिंग जमीन भुमीहिन, दिव्यांगाना प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शासकीय जमीन मिळावी.

    ३) दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य संस्थेत पाच टक्के निधी तात्काळ वाटप करण्यात यावा.

    4) ग्रामीण भागातील गोरगरिबांना तिनशे दिवसाचा रोजगार तात्काळ देण्यात यावा
    ईत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले ते यशस्वी करण्यासाठी गंगाधर वाघमारे, बालाजी होनपारखे, कांबळे विठ्ठल, राजू श्रीराम, बोडके हिंमत, बोरगावकर
    ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी पञक देण्यात आले.