चंद्रपूर जिल्ह्यात (दि.15एप्रिल) रोजी 24 तासात 382 कोरोनामुक्त 1171 कोरोना पॉझिटिव्ह – कोरोना बधितांचा 16 मृत्यू

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1171 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 37 हजार 919 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 162 झाली आहे. सध्या 8212 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 16 हजार 119 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 72 हजार 660 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील भिवापुर वॉर्ड येथील 63 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 62 वर्षीय महिला, घुटकाला येथील 60 वर्षीय पुरुष, जवाहरनगर वार्ड राजुरा येथील 57 वर्षीय महिला, चिमूर येथील 65 वर्षीय, 63 वर्षीय व 70 वर्षीय महिला, गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील 60 वर्षीय महिला, वरोरा येथील 70 वर्षीय महिला, राजुरा येथील 39 वर्षीय पुरुष, बोरगाव, कोरपना येथील 62 वर्षीय महिला, गोवारी राजूरा येथील 65 वर्षीय पुरुष, मोरोशी, नागभिड येथील 74 वर्षीय पुरुष, सिंदेवाही येथील 53 वर्षीय पुरुष, यात्रा वार्ड वरोरा येथील 85 वर्षीय पुरुष व बल्लारपूर येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 545 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 498, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1171 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 432, चंद्रपूर तालुका 60, बल्लारपूर 15, भद्रावती 79, ब्रम्हपुरी 72, नागभिड 26, सिंदेवाही 32, मूल 22, सावली सात, गोंडपिपरी नऊ, राजूरा 44, चिमूर 125, वरोरा 147, कोरपना 80, जीवती सात व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात नऊ मृत्यूसह आज(15 एप्रिल) 328 नवीन कोरोना बाधित तर 145 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.15: आज जिल्हयात 328 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 145 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13585 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11068 वर पोहचली. तसेच सद्या 2343 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 9 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील 72 वर्षीय व 50 वर्षीय दोन महिला, कानचपूर ता. मुलेचरा 43 वर्षीय पुरुष, रेड्डी गोडावून गडचिरोली 46 वर्षीय पुरुष, गोकूल नगर गडचिरोली 55 वर्षीय पुरुष, वनश्री कॉलनी गडचिरोली 58 वर्षीय महिला , मानगडा ता. आरमोरी 68 वर्षीय महिला, पिंपलगांव ता. लाखानदूर जिल्हा भंडारा 65 वर्षीय पुरुष, शारदा कॉलनी ता. ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.47 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.25 टक्के तर मृत्यू दर 1.28 टक्के झाला.

नवीन 328 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 145, अहेरी तालुक्यातील 32, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 23, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 06, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 07, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 14, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 8 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 28 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 145 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 35, अहेरी 14, आरमोरी 07, भामरागड 21, चामोर्शी 22, धानोरा 06, एटापल्ली 01, मुलचेरा 05, सिरोंचा 07, कोरची 05, कुरखेडा 07, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.