कळवण – अपहरण झालेल्या आदिवासी मुलीची पंजाब मधून सुटका- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

    34

    ?मुलगी घरी पोहचल्यानंतर शिवसेनेनला दिले धन्यवाद

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    कळवण(दि.21मे):- (सा वा ) उंबरपाडा, ता सुरगाणा जिल्हा नाशिक येथून अपहरण झालेल्या १२ वर्षीय आदिवासी मुलीची रहस्यमय सुटका झाली असून ती आपल्या घरी पोहचली आहे. तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या पंजाब व महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

                याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील सोनाली गावित या आदिवासी मुलीचे  ४ एप्रिल अपहरण झाले होते. त्या ट्रक मध्ये आणखी 15 मुले अपहरण झालेले होते. पण ती मुले कुठली होती हे त्या मुलीस समजले नाही त्यांना एका ट्रकने पंजाब राज्यात नेण्यात आले होते. हा ट्रक अमृतसर भागातून एका ठिकाणी ट्रक थांबलेले असतांना हि मुलगी ट्रकमधून उडी मारून पळून गेली. तीची भेट एका महिलेशी झाली. त्या महिलेले सोनालीच्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. सोनालीची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शिवसेनेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांना सर्व हकीगत सांगितली. 

               एप्रिल महिन्यात कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरु असल्याने व सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने  या मुलीला घेण्यासाठी सुरगाणा तालुक्यातून अमृतसर पंजाब येथे जाणे सहज शक्य नसल्याने त्यांनी कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांच्या संपर्क करून मदतीचे आवाहन केले. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिवसेना नेते खासदार संजय राऊत,  उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार सुनील राऊत यांना माहिती देते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनालीला घेण्यासाठी केशरीनाथ पाटील व मोहन गांगुर्डे यांनी पंजाबकडे प्रस्थान केले.

    या काळात नेते मंडळीने अमृतसर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मदत करण्यासाठी सांगितले.  अमृतसर येथे पोहचण्यासाठी त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. अमृतसर गाठल्या नंतर  पंजाब शिवसेना राज्यप्रमुख शर्माजी, युवासेना प्रमुख संजीव भास्कर व यंत्रणेने त्यांना मदत केली. शेवटी शर्तीचे प्रयत्न करून विमानाने सोनालीला मुंबईला आणण्यात महाराष्ट्र शिवसेनेच्या पधाधिकार्यांना यश आले. शेवटी दि १४ मे २०२१ रोजी अक्षयतृतीयेदिनी सोनाली आपल्या घरी पोहचली. यावेळी सोनाली व तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. हि  वार्ता कळवण – सुरगाणा मतदार संघात वाऱ्यासारखी पोहचली. अपहरण झालेल्या आदिवासी मुलीला घरी परत आणण्यात शिवसेना पधाधिकार्यांना यश आल्याने सर्वत्र शिवसेनेच्या कार्याचे कौतुक होत आहे.   

     

    केशरीनाथ पाटील – शिवसेना सहसंपर्क प्रमुख कळवण – सुरगाणा मतदार संघ –  

     शिवसेना प्रमुख वंदनिय स्व बाळासाहेब ठाकरे यांनी नेहेमीच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांना दिलेली २०% राजकारण व ८०% समाजकारणात रहा जनतेची कामे सेवा मदत करत रहा त्यांचेच आशिर्वाद म्हणजेच आपली ताकत- उर्जा मिळाल्याने सोनालीला अनेक अडचणींचा सामना करूनही घरी पोहचवले व त्यावेळी त्या माऊलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून झालेला त्रासही कमी झाला.

    मोहन गांगुर्डे – शिवसेना सुरगाणा तालुकाप्रमुख – आदिवासी भागात अशा अनेक घटना घडत असतात. मात्र या कडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. परंतु मला घटनेची माहिती मिळाली व ती माहिती मी पाटील सो यांच्या कानावर टाकताच त्यांनी दाखवलेले सकारात्मक विचार यामुळेच सोनालीला घरी आणणे शक्य झाले. याबाबत लोक जेव्हा विश्वासाने म्हणतात हे काम शिवसेनाच करू शकते. तेव्हा शिवसेनेत काम केल्याचे समाधान लाभते.