इंडिया मेघा ऍग्रो कंपनी विरोधात ३ जून रोजी जनआंदोलन

    36

    ✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नायगाव(दि.१जून):- कुष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी कडे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल सोयाबीन, हळद,हरबरा ,मका विक्री केली व त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने किसान ब्रिगेड व रयत क्रांती संघटनेच्या वतीने 3 जून रोजी “भाजी भाकरी” जनआंदोलन करण्याचे आज झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकित घोषणा देण्यात आली आहे.
    कुष्णुर येथील इंडिया मेघा ऍग्रो कंपनी कडे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल सोयाबीन, हळद,हरबरा ,मका विक्री केला आहे.

    पण गेल्या सहा महिण्यापासून शेतकऱ्यांना रक्कम दिलेली नाही शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला तेव्हा कंपनी तर्फे योग्य,सत्य माहिती देण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.त्यात आता शेतकऱ्यांची पेरणी जवळ आली तरीपण कंपनी कडून पैसे भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी आज प्रतिनिधी शेतकरी यांच्या उपस्थितीत कंपनीच्या गेट समोर भर उन्हात बैठक घेण्यात आली.यावेळी कंपनी व्यवस्थापक कडे शेतकऱ्यांनी प्रमुख मागणी केली कि किती शेतकऱ्यांची रक्कम देने आहे जाहीर करावे व रक्कम कधी देणार लेखी द्यावे ही मागणी कंपनी तर्फे मान्य करण्यात आली नाही.

    कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्याशी स्पीकर फोन वर शेतकऱ्यांनी चर्चा केली तेव्हा त्यानी शेतकऱ्यांचे समाधान करू शकले नाहीत,फक्त उडवा-उडवीचे उत्तरे देन्यात आली व गोड गोड बोलून असत्य बोलन्यात आले.त्यामुळे या बैठकीत कंपनी विरोधात गुन्हा दाखल न करता रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.यावेळी कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ३ जून रोजी भाकर -भाजी घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी डॉ.सुरेश कदम,किसान ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष डॉ.दत्ता मोरे,रयत क्रांती संघटना युवा प्रदेशाध्यक्ष श्री पांडुरंग शिंदे,रयत क्रांती संघटना नायगाव तालुका अध्यक्ष शहाजी कदम, गंगाधर कुलकर्णी, दत्ताहरी हिवराळे,आनंद माने, मधुकर ताटे ,व्यंकट कदम,जीवन श्रीसागर व अनेक शेतकरी उपस्थित होते