✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
कोल्हापूर(दि.11जुलै):-अश्रू या कविता संग्रहातील कविता आयुष्याला अडचणीतही सकारात्मकपणे सामोरे जाण्याला मदत करतात. कारण मानवी संघर्ष प्रखरपणे या कवितांमधून वाचकाला पानोपानी वाचायला, अनुभवायला मिळतो. असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, लेखक प्रदिप पाटील यांनी केले. ते अश्रू या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी आदित्य सभागृह येथे बोलत होते.
प्रसिद्ध कवी व लेखक चंद्रकांत सावंत यांचा अश्रू हा कविता संग्रह प्रयास प्रकाशनने प्रकाशित केला. याचा प्रकाशन सोहळा रविवार दि.11 जुलै रोजी उमा टाॅकिज येथील अदित्य सभागृहात तळमावले येथील प्रसिद्ध कवी व लेखक प्रदिप पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आयुष्यात सुख- दुःखं येतच राहतात. याचा विचार न करता माणुस नेहमी नश्वर गोष्टींच्या मागे धावतो. स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने निसर्गाची वाताहत केली आहे. याचे परिणाम त्याला येत्या काळात भोगायला लागतील.