जाती पेक्षा कामगार कर्मचारी म्हणून संघटीत व्हा

    42

    “जो हक मांगनेसे ना मिले, उसे छिन के लेना पढता है।” आपना सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला महामंत्र “शिका,संघटीत व्हा आणी संघर्ष करा.हा क्रम लोकांनी बदलून टाकला प्रथम आपसात संघर्ष करतात. त्यांचा फायदा दुसऱ्या समाजाने घेतला की एक दिवसा करीता संघटित होतात.किंवा एक दोन महिने राज्यभर जन आंदोलन करतात.मग त्यातुन काय शिकतात?. आरक्षणातील पदोन्नती साठी कामगार कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष आज सुरू आहे.त्यांनी कामगार चळवळीचा इतिहास वाचला असता तर?. जगातील ज्या काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये कामगारांची महत्वपूर्ण भूमिका होती. कामगार संघटनांनी शासनावर नेहमी दबाव ठेवावा, जर शासन ऐकत नसेल तर सत्ता हस्तगत करावी. ही बाब बाबासाहेबांनी मुबंईच्या मील संपाच्या भाषणात प्राकर्षाने सांगितली होती. पण आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचा फायदा अनेक मनूवादी कामगार संघटनांनी उचलला.त्यांनी राष्ट्रीय ट्रेंड युनियन बनविल्या,भांडवलदार आणि सत्ताधारी पक्षाची त्यांनी दलाली सूरू केली.

    आणि आम्हाला मात्र जात,धर्म,प्रांतात गुंडाळून ठेवले.त्यामुळे असंघटीत कामगारांच्या कंत्राटी कामगार फौजा निर्माण झाल्या.कामगार कल्याण मंडलात सर्व त्यांचेच प्रतिनिधी (कामगारांच्या सभासद संख्येनुसार) आहेत. त्यामुळे आजही आम्हाला (minimum vej) किमान मजूरी पूरेशी मिळत नाही. जनआंदोलनात आमची भाषा मात्र नेहमी “असा कसा देत नाही?. घेतल्या शिवाय राहत नाही!.” अशी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीवर उभे राहून भान ठेवून बोलले व वागले पाहिजे.राष्ट्रीय संघटन बनविले पाहिजे की नाही?.किमान वेतन न दिल्या गेल्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना परदेशात काय भोगावं लागलं हे यादेशातील प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती तरी महिने ओरडून सांगत होती. मिनीमम वेजचे इतर देशात काय महत्व आहे हे आपल्या देशातील कोणत्याच कामगारांच्या ट्रेंड युनियन व मीडियाच्या लक्षात येत नाही.

    स्वतंत्र मजदूर यूनियन (आय.एल.यु) संपूर्ण देशभर रेल्वे,विद्युत,बँक,खदान,कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर,व सर्व संघटीत,असंघटीत कामगारांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करीत आहे. आपल्या मूलभूत हक्काची लढाई राज्य व केंद्रा सरकारच्या विरोधात आदरणीय जे एस पाटील साहेब यांच्या कुशल त्यागी नेतृत्वाखाली सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आहे. ८ डिसेंबर २०१७ ला दिल्लीच्या रामलीला मैदानात लाखो आरक्षण लाभार्थी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सहभागी झाले होते. बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व कामगार,कर्मचारी बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे की “नाव भिमाचं नी काम बापूचं” सोडून द्या. “नावंपण भिमाचचं नी काम पण भिमाचंच” यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनचे संघटनेचे सदस्य बनून स्वाभिमानाने जगण्यासाठी कामाला लागा.तुमच्या खात्यातील कामगार,कर्मचाऱ्यांना संघटीत करून त्यांची ट्रेंड युनियन रजिस्टर करा त्यांचे संस्थापक अध्यक्ष तुम्हीच राहा पण ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारधारेच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आय.एल.यु शी संलग्न करा.

    अन्यता केवळ आरक्षणच नाही,तर भारतीय संविधान नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही. राजकीय गटबाजी संपविण्यासाठी ट्रेंड युनियनलाच पुढाकार घ्यावा लागेल.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली ट्रेंड युनियन ने काम केल्यामुळे कामगार कर्मचारी उद्धवस्त झालेत.राजकीय पक्ष हा नेहमी भांडवलदारांच्या आर्थिक मदतीने निवडणूका लढत असतो. त्याबदल्यात तो कामगार कर्मचाऱ्याच्या शोषण, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही, राजकीय नेते कामगार कर्मचाऱ्यांना अपंग बनवुन ठेवतात.हा इतिहास सर्व कामगार कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा. आताचे केंद्र सरकार आर एस एस प्रणित आहे त्यांना यादेशाचे संविधान नको आहे,ते नष्ट करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे त्या हिसेबानी ते कामाला लागले.आपले काय?.आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही पक्ष संघटनेकडे या विरोधातील कृती कार्यक्रम नाही.

    आता आपण कामगार कर्मचारी गप्प बसलो तर केवळ आरक्षण नाही,तर संविधान लोकशाहीच्या मार्गानेच संपविल्या जाईल.नंतर एक होतं संविधान असे म्हणण्याची पाळी आपल्यावर यायला ऊशीर लागणारं नाही.हीच वेळ आहे निर्णय घेण्याची यांचे उत्तर बाबासाहेबांनी तेव्हा दिले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली स्थापन केलेली स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) आहे.त्यात देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन बाबासाहेबांनी १२/१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे रेल्वे गँगमन कामगारांच्या दोनदिवशीय परिषद मध्ये केले होते.आज आता आरक्षण लाभार्थीची नोकरी धोक्यात आली आहे,नव्हे पुढील पिढीचे भविष्य अंधकारमय होणार आहे.म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांनी ट्रेंड युनियन मध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता आपली खरी ओळख दाखविण्याची वेळ आली आहे.

    भारतातील बहुसंख्येने कामगार कर्मचारी हा मागासवर्गीय शोषित,पिढीत व आदिवासी अन्यायग्रस्त असल्याने त्यांना ७० वर्षानंतर ही सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकला नाही. आताच्या आर एस एस प्रणित भाजपा सरकारने एक हजार कामगार कायदे विना चर्चा रद्द करून टाकले.शेतकरी शेतमजूर, असंघटीत कामगार यांचे प्रश्न तर संघटीत कामगारांच्या प्रश्नापेक्षा विक्राळ स्वरूपात उभे आहेत.त्यावर प्रस्थापित कामगार चळवळी कोणताच वैचारिक संघर्ष करण्यासाठी तयार नाही. त्याचे दुःख मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांना बिलकुल नाही.भारतात आजमितीला सात टक्के संघटीत कामगारांच्या ५५ हजार युनियन नोंदणीकृत आहेत.तर ९३ टक्के असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय युनियन नाहीत. संघटीत कामगार करीता वैचारीक पातळीच्या तेरा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कार्यरत आहेत.त्यांची अधिकृत मान्यता ही मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांच्या मेंबरशिप वर अवलंबून आहे.

    त्या या प्रमाणे आहेत.१) ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC ),२) सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (CITU),३) भारतीय मजदूर संघ (BMS),४)हिंद माजदूर किसान पंचायत (HMKP),५) हिंद मजदूर सभा (HMS),६) इंडियन फेडरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन (IFFTU),७) इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस (INTUC),८) नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (NFITU),९) नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (NLO),१०) ट्रेंड युनियन को-ऑडीनेशन सेंटर ( TUCC),११) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस (UTUC),१२) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस-लेनिन (UTUC-L), १३) कॉन्फडेरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन ऑफ इंडिया (CFTUI). यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी त्यांचे सांस्कृतिक संस्कार एकच आहेत. हे आम्ही विसरतो.म्हणूनच आय एल यु ला राष्ट्रीय ट्रेंड युनियन चा दर्जा मिळू शकला नाही.म्हणून देशातील तमाम मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी आपल्या संघटना, युनियन आंबेडकरी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी संलग्न करून शक्ती प्रदर्शन करावे.असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!.ही भाषा आता बंद करावी,आणि भविष्य उज्वल करण्यासाठी आरक्षण लाभार्थी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी बनावे!.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब म्हणाले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी तुम्ही सुखात रहावं म्हणून यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो M.A., PH.D., M.SC., D.SC., L.L.B.तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होते. पण मी ती नाकारली. का?.कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्याचा होता.मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो.पण नाही.माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी.मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो.महार,मांग,चांभार,सुतार,लोहार,नाव्ही,माळी,धनगर,कुणबी,कोळी या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो.मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला.पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी “हिंदु कोड बिल” बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले.

    मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC,ST,OBC, NT यांना आरक्षण दिलं.पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत.तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा.हे सर्व बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी यांनी एक व्हावे.तुम्ही सर्वांनी एकत्र या कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!. असे किती दिवस म्हणत राहणार?. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे,तीव्र निदर्शने,धरणे,जेल भरो आंदोलने असे इशारा,आव्हान,धमक्या किती दिवस देत राहणार?.कृतीसामित्या बंद करा एकसंघ व्हा एकाच संघटना एकच बाबासाहेब स्वीकारावा लागेल.गटबाजीचे दुकाने बंद न करता एकत्र येणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे.आम्ही त्यांना मानतो पण आमचा गट,संघटना,युनियन कायम ठेवतो अशी भूमिका घेतल्यास राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियन कशी निर्माण होईल.त्यामुळेच राज्य व केंद्र सरकार आरक्षणावर कोणत्या संघटना,युनियन चर्चा करतांना दिसत नाही.गेले सहा महिने मुख्यमंत्री यावर बैठक चर्चा करण्यासाठी वेळ देत नाही. मागासवर्गीय मंत्री स्टेजवर भाषण देतांना सांगतात,न्यायालयाच्या अधीन राहून पदोन्नती पूर्ववत करण्यात येईल.मग ज्यांनी आज पदोन्नती घेतली ते आणि त्यांच्या संघटना युनियन गप्प बसतील काय?. दोन समाजात प्रचंड भांडणे लावून त्यांना कसे शांत केले जाईल.जाती जातीच्या संघटना कामगार म्हणून एकत्र कसा येतील?. त्या जर कामगार, कर्मचारी म्हणून मान्यताप्राप्त ट्रेड युनियन सोबत राहत असतील. तर न्याय कसा मिळेल?. म्हणूनच देशातील सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने आरक्षण विरोधी संघटना,युनियन मधून बाहेर पडावे.आणि एक क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेड युनियनशी संलग्नता स्वीकारावी.

    तरच सनदशीर मार्गाने सर्व प्रकारचे आरक्षण वाचवता येईल.जाती संघटना पेक्षा कामगार संघटना कधी मोठ्या असतात.हे लक्षात घ्यावे.संख्येच्या बळावर सनदशीर मार्गाने लढावे.तर सविधाना नुसार न्याय मिळेल.

    ✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य)९९२०४०३८५९