शून्यातून विश्व निर्माण करणारी आई अशिक्षित नसते

77

मुलाला नऊ महिने पोटात सांभाळून जन्म देणारी आई, शून्य ते पांच,सहा वर्षे संगोपनासाठी कष्ट,त्याग करणारी आई .कधीच अशिक्षित नसते.तिला मुलं मोठी झाल्यावर त्याचं आईला अशिक्षित अडाणी म्हणतात. त्या उच्चशिक्षित मुलामुलींना सणसणीत उत्तर एका बापाने कसे दिले ते वाचा आणि इतरांना सांगा.सुशिक्षित कोण शाळांत परीक्षेत ९० टक्के गुण मिळवलेला मुलगा कि शाळा न शिकलेली आई. मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९० टक्के गुण मिळाले. वडील खुशीने गुणपत्रिका (Marksheet) न्याहाळत आपल्या पत्नीला सांगतात, अग… छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९० टक्के मार्क्स मिळालेत शालांत परिक्षेत..!

आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, बघुया मला दाखवा…! इतक्यात,मुलगा पटकन बोलला. बाबा तिला कुठे Result दाखवताय ?. तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती…! भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली. ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली. मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले “हो रे ! ते पण खरच आहे…! आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेऊया.पण तुझी आई ठामपणे नाही म्हणाली. नको ते नंतर वगैरे. फिरण व समजण पण नको. आणि तुझा जन्म झाला. खरच अशिक्षित होती ना ती.
तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सद्धृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती. कारण ती अशिक्षित होती ना.

तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.ती वेडी अशिक्षित होती ना. तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येऊन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची.तिला पुस्तक वाचता येत नव्हती पण व्यवस्थितपणे पिशवीत म्हणजे दप्तरात ठेवणारी ती आई अशिक्षित होती ना.तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास तेव्हा रात्र-रात्र जागुन ती परत सकाळी तिची सर्व काम चोख करायची.कष्टकरी आई अशिक्षित होती ना. तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची. मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या साड्या घालण्याची तिला आवड नव्हती तिला, परिस्थतीची जाणीव असलेली अशिक्षित आई होती ना ती. बाळा.चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःचा स्वार्थ आणि मतलब बघतात.पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही. कारण खरेचं ती अशिक्षित आहे ना.ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची म्हणून मी अभिमानाने सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे.

हे सगळ ऐकुन मुलगा रडत रडत आईला बिलगुन बोलतो. आई मी तर फक्त पेपरवर ९० टक्के मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १०० टक्के बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९० टक्के मार्क मिळवतात. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.आई आज मला ९० टक्के मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल. प्रत्येक मुला- मुलीनी जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात. त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी.तीन रुम किचनचा एखादा फ्लॅट, दोन चार एकरचे फार्म हाऊस एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं.म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय.

पण सुखी काही दिसत नाही. आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही. मग आता काय झालं?. ती मजा कुठ गेली?. आता एकटं एकटं का वाटतं ?. आणि छातीत धडधड का होते?. कशामुळे करमत नाही?.कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली.विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपणं,छंद जोपासणं,पाहुणे होऊन जाणं,पाहुण्यांचे स्वागत करणं, खूप गप्पा मारणं,घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडने.या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं.तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली. तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता?. असे किती मित्र,शेजारी,नातेवाईक आपण निर्माण करू शकलो. खूप कमी,किंबहुना नाहीच.मग आपण विश्व निर्माण केलं का?.

तर नाही मित्रानो, ते रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायलीत विश्व व भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही.लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व कधीच नसते.मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही.हे समजून घ्यावे लागेल. मोठं बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील. इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल.तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य?.वाचा,विचार करा,अहंकार सोडा, माणूसकी जपा. इतरांच्या कामी या.सोबत काहीचं येत नाही. मी पुस्तकात, फेसबुक वर,वॉट्स अँप वर वाचलेले प्रेरणादायी विचार वाचकांना देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते, ज्यांचे दुःख ऐकणारा कोणी नसतो,त्याला ते लवकर समजते तो आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त करतो.

माझा मनातील भावना तुम्ही लिहल्या म्हणतो.आनंदीत होतो नियमितपणे संपर्कात राहतो.आजच्या घडीला अनेक वाचक मला वेळोवेळी त्यांच्या घरातील सुखा दुःखाच्या घटना सांगून सल्ला मागतात,त्यातील एक पंढरपूरचे संतोष भाऊ त्यांच्या आईवडिलांची करोडो रुपयांची संपत्ती वडिलांच्या भावांनी त्यांच्या मुलांनी कशी आईवडिलांना बंदिस्त करून हडप केली.ती खूप वेदनादायी गोष्ट आहे, असो सुखाच्या मागे धावणारे मुलंमुली आईवडिलांना अशिक्षित समजून शिक्षण पूर्ण करतात.पणशून्यातून विश्व निर्माण करणारी आईवडील अशिक्षित नसतात.जे आम्ही भोगले ते आमच्या मुलामुलींना भोगायला येऊ नये हीच इच्छा कायम ठेवून जगतात.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई,