मनिषा वाल्मिकी सामुहिक अत्याचाराची घटना देशाला काळीमा फासणारी – स्वाभिमानी रिपाई नेते शशिकांत जगताप

33

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक्(दि.3ऑक्टोबर):-उतरप्रदेश मधील हाथरस येथे मनिषा वाल्मिकी या तरूणीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला. व तिची जिभ छाटली दि.29 सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान तिचे निधन झाले..हे अमानवी कृत्य असुन ही घटना संपुर्ण देशाला काळीमा फासणारी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी रिपाई येवला तालुका सचिव शशिकांत जगताप यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

देशात विशेषतः उत्तरप्रदेश बिहार मध्ये महिला, लहान मुली सुरक्षित नाहीत परंतु गाई सुरक्षित आहेत. योगी सरकार दलितांवर अन्याय- अत्याचारावर चिडीचूप आहे.एक मनिषा वाल्मिकीची दिसलेली अनं उजेडात आलेली घटना दिसली व प्रक्षोभ उसळला एका रात्रीत तिची राखं केली .आजही देशात न दिसलेल्या किती मनिषा आहेत?2019 च्या दलित अॅट्रासिटीचे प्रमाण उत्तरप्रदेश मध्ये 26% होते.

त्यात आता 7 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. देशभरात दर सहा मिनिटाला एक बलात्कार होतो हे N C R B सांगून जास्त दिवस झालेले नाहीत. हा देश बलात्का-यांचा आहे हे ही आकडेवारी सिध्द करते.

मनिषाचा मृत्यूदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यविधी करणा-या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आली पाहिजे व आरोपींना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे असे शशिकांत जगताप म्हणाले.