राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील ?

32

(जिजाऊ जयंती १२ जानेवारी निमित्य विशेष लेख)

आज राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब कोणत्या महिलांच्या आदर्श आहेत?. मराठा सेवा संघाच्या पंचवीस वर्षाच्या प्रबोधन व जनजागृती मुळे आज काही मराठा माता भगिनी त्यांना अभिवादन करायला लागल्या पण राजकीय पक्षात असलेले मराठे अजूनही खुल्या मनाने त्यांचा वैचारिक स्वीकार करीत नाही.त्यांच्या कोणत्याही मंगल कार्यात राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज कधीच निमंत्रण पत्रिकेत दिसत नाही. त्यांना कुलदैवत, अनेक माता प्रसन्न असतात आणि कार्य सिद्धीस नेण्यासाठी स्वामी समर्थ असतात. त्यामुळेच मी लिहतो की जन्म पासून लग्ना पर्यत कार्य सिद्धीस नेण्यासाठी समर्थ असतील तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने २०१४ ला राज्यात व केंद्रात आर एस एस प्रणित भाजपा शिवसेना युतीचे सरकार होते.पण २०१९ भाजपाच्या ब्राह्मणशाहीचा माज उतरवून प्रबोधनकार ठाकरे यांच्या रक्ताच्या वारसदारांनी राजकीय कौशल्य आत्मसात करून महाविकास आघाडीची स्थापना केली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र काबीज केला असे म्हणता येईल. त्यामुळे खरी वैचारिक लढाई तेव्हा सुरू झाली होती. जय शिवाजी, जय भवानी या घोषणे मुळे मुंबईतील शिवसेना राज्याच्या खेड्या पाड्यात गेली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि वाघ हीच खरी ओळख शिवसेनेची होती.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या क्रांतिकारी विचारांशी त्यांना काही घेणे देणे नव्हते.भांडारकर संस्थेच्या भटांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे जेम्स लेनने राष्ट्रमाता जिजाऊचे चारित्र्य हनन केले तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांची व सैनिकांनी कोणाचे रक्षण केले होते. तेव्हा शिवसेनेची वैचारिक भूमिका काय होती ?. हा इतिहास मराठा समाज विसरला नसेल. तर भाजपा कशी वाढली हे तपासून पाहावे लागेल. आता शिवसेना सत्यशोधक समाजाची तडपती तलवार प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊन पुढे वाटचाल करीत आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण होईल ही अपेक्षा ठेऊ या.

इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जिवंतपणी जेवढी मानहानी झाली नाही त्यापेक्षा जास्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांची मानहानी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील वारसदारांनी महाराष्ट्रात लावली होती.इतिहासाचा खून करून जातीजातीत विष पेरण्याची स्पर्धा लावली आहे.त्यासाठी त्यांचे जात बंधु प्रिंट मीडिया, चॅनल मीडियावर ठाण मांडून बसले आहेत. ते समाजात कशी बदनामी होईल यावरच आपली बुद्धी खर्च करीत असतात.

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व मातानी ठेवली तर आमच्या ही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे शूरवीर निर्माण होतील. (जर संभाजी भिडेच्या हातून मराठा तरुण मुले सुटली तर) राष्ट्रमाता जिजाऊ ही इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती. स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब, शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती. त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती जिजामाता होती. हे जरी शंभर टक्के सत्य असले. तरी मराठयाच्या मनावर जिजामाते पेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आज ही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?.

स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामातेची म्हणजे एका स्त्री ची होती.परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून “स्वराज्य” निर्माण करणे हि “श्री” ची इच्छा होती.हे विद्यार्थीदक्षे पासुन मुलामुलींच्या मनावर बिंबविले जाते.त्यामुळे जिजामाते पेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे. मराठा सेवा संघाच्या प्रबोधानाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.त्यामुळे एक घोषणा सर्व ठिकाणी निनादते “एकच वारी बारा जानेवारी”. यांची खरच अंमलबजावणी झाली.तर शेगांव,शिर्डी आणि पंढरपूर च्या पायी यात्रा निश्चित बंद होतील.त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन मागासवर्गीय समाजाची करोडो रुपयाची बचत होईल.आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होती.म्हणुन एकच वारी बारा जानेवारी ही केवळ घोषणा नाही. क्रांतिकारी सूत्र किंवा मंत्र होईल.

भारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्याच्यावर संस्कार केले जातात.त्यांना शाळा कॉलेज मधून हे शिकविल्या वर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल?. स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच मनुवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत. राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार असतात. लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची. म्हणुन त्यांना गुलामच म्हटले पाहिजे.

रामायणातील संस्कार कोणाला हि शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही.तर दुसऱ्या करीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते.तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते. असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि घरभेद्याशी लढाई केली नसती. शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे.हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हरले नाहीत.ती हिंमत लहानपणा पासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्याच्या मागे सदैव उभी होती.आज कालच्या माता मुलामुलीच्या मनात हिंमत निर्माण करण्या ऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात.त्याच्या पासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडनी करतात.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे.जी माता स्वताच्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते.ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते. ती जगा बाबत विचार करूच शकत नाही. त्यात एकादीच जिजामाता, सावित्रीमाता,रमाईमाता, अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात.जगात आदर्श निर्माण करतात.इथे शालिनीताई,प्रतिभाताई,प्रभाताई,शोभाताई, मीनाताई,निलमताई,मेघाताई,सुप्रिया ताई निर्माण झाल्या. त्यांचा शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता.त्या गुलामांच्या गुलाम होत्या.त्यांच्या कडून राज्यच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.

परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना. जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रमाता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना, अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते.तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी,वर्णबंदी, जातबंदी,रोटीबंदी,बेटीबंदी,शिक्षणबंदी,समुद्रबंदी होती. या सर्व बंदया प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावुन मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली.मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात.व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात.या मुंग्यांच्या एकजुटीतुन शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली.आणि सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणाना मावळे म्हणून गोळा केले.सम्राट अशोकाच्या नंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतीच्या गादीचा वारसा निर्माण केला.

चंदगुप्त मौर्या,सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली.जिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला.यांचे भान आजच्या आरक्षण मांगणाऱ्या मराठा क्रांति करणाऱ्यांना नाही. १४५ आमदारांनी मराठा आरक्षणा करीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपाला समोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते.१४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही.भारतीय संविधान निर्माते त्यांची ती एकजातीय दादागिरी जाणुन होते म्हणुन त्यांनी तशी तरतुद लिहून ठेवली.म्हणुन ते मोर्चात सहभागी होतात.

छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष, संस्था,संघटना जिजामाता ची जयंती साजरी करताना दिसत नाही.पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने गल्लीबोळात साजरा करताना दिसतात.ममता,समता,करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते.ज्यांच्या आईवडीलाचा पत्ता नाही,कुठे जन्मले?. गांव, तालुखा,जिल्हा, राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते,मात्र जिजामाता, सावित्रीमाईचे जन्मा पासून मृत्यू प्रयन्त सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहल्या आणि दाखविल्या जात नाही, छत्रपती शिवाजी महाराजाना आद्यदैवत मानणारे जेव्हा त्याच्या मातोश्री चे चरित्र हरण करून विटंबना केली जाते.

तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळयाय खःटाक आवाज करीत नाही.अन एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला जातो.यालाच आईचे व दाई प्रेम म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हरण करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवल्या जाते.राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्था करीता हे त्यांचे गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊच्या चरित्रावर लिहणाऱ्यानां पिता समान मानुन मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण तरुणीला कशी दिसत नाही. त्यांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकुळ घालणारी ही पोर कोणत्या मातेची आहेत?. त्यांना राष्ट्रमाता जिजामाता.छत्रपती शिवाजी महाराजाची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही.मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील?.

छत्रपती संभाजी राजे यांच्या शरीराचे तुकडे गोळा करून अग्नी देणारा समाज आज देशाचा सर्वात मोठा गुन्हेगार ठरविण्याची नियोजित योजना यशस्वी होत आहे.त्याला त्यावेळी मुख पाठींबा देणारा समाज आज ही मुख पाठींबा देऊन गप्प बसणार असेल तर देशात महाभारत घडेल, संविधानामुळे सर्व जाती,धर्माचा,पंथाचा,राज्याचा नागरिक भारतीय म्हणूनच सुखाने जगत असतांना हे इतिहास खोटा सांगून समाजा समाजात आग लावुन मज्जा घेत आहेत.मानव जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार?.त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे,स्वता जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे,मराठा सेवा संघाने लावलेल्या प्रेरणादायी प्रबोधन रोपांचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्यांच्या 32 फांद्या समाजाला गोड गोड फळांचे बौद्धिक टॉनिक देत आहे.संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या तरुण तडपदार विचारवंतांनी भटा ब्राम्हणाची झोप उडविली असतांनाच भिमा कोरेगांव च्या शौर्याला दोनशे वर्षा नंतर सुरुंग लावल्या गेला.

तो कुचकामी ठरविण्याची मोठी जबाबदारी सेवा संघ प्रणित ब्रिगेड वर आली होती. त्यांनी योग्य दखल घेऊन ती निभावली. कोरेगाव भिमा जगाच्या नकाशावर गेले. संभाजी महाराजांना मनुस्मृती नुसार मारलेले वढू गांव आणि समाधी असलेलं तुळापूर गांव एक जानेवारी ला लाखोंच्या संख्येने वेढले जाते.कोरेगाव भिमाच्या विजयी स्थंभाला मानवंदना देणारे शुर वीर इथेही नतमस्तक होता.इतिहास प्रेरणादायी असला की लोक घाबरत नाही, पेशवाई नष्ट करणारी लढाई दोनशे वर्षानंतर लोक विसरतील आणि कोरेगाव भिमा ला येणे बंद करतील अशी अपेक्षा होती, पण दोनशे दोनला ती लाखाने वाढली आणि नव्याने इतिहास लिहला जात आहे. हा प्रेरणादायी इतिहास मराठा समाजाने वाचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज तयार करण्यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ घराघरात असल्या पाहिजेत नां ?.म्हणुनच एकच वारी बारा जानेवारी स्वाभिमानी मराठा बहुजन मागासवर्गीय समाजाच्या घराघरात राबविली पाहिजे.हिच राष्ट्माता जिजाऊच्या जयंती निमित्त अपेक्षा.सर्व बहुजन समाजास राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्माता जिजाऊच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम

✒️लेखक:-रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई ९९२०४०३८५९.