लीडर जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात

    44

    कोकणात तीन दिवसांचा माझा हा तिसरा दौरा झाला, तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार चळवळ सांगून कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वतंत्र मजदूर युनियन शी विचारांने जोडणे हाच प्रमुख उद्देश होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सफाई कामगारांची पहिली युनियन स्थापन केली ती १९३४ ला त्यावेळी बहुसंख्येने सफाई कामगार हे कोकणातील होते आणि आजही महानगरपालिका मध्ये घन कचरा व्यवस्थापन सह इतर विभागात कोकणातील कामगार माणूस लक्षवेधी आहे. गावकी भावकीत तो जो शिस्तबद्ध आहे तसाच तो आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीत नेतृत्व करण्यासाठी लक्षवेधी असला पाहिजे होता.

    कारण त्यांचे वडील आजोबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते तोच त्यांना प्रेरणादायी आदर्श असला पाहिजे होता. कोकणातील माणूस कधी कधी गर्वाने सांगतो बाबासाहेब आंबेडकर कोकणातील होते. आंबावडे, त्यांचे मुळगांव, रमाईचे जन्म गांव वनंद,मंडणगड, दापोली रत्नागिरी जिल्हा हे सर्व चळवळीचे प्रमुख प्रेरणादायी केंद्र आहेत.त्याच पद्धतीने कोकणातील महाड चवदार तळे आंदोलन दोन कारणाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले आहे. एक चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह तर दुसरे मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन. त्यामुळेच कोकण विभाग हा आंबेडकरी चळवळीचा प्रथम संघटन, सत्याग्रह,आंदोलन,संघटन कौशल्य,वक्तृत्व नेतृत्व घडविणारे केंद्र समजले पाहिजे.परंतु असे काही दिसले नाही.

    कोकणात महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका, नगर पंचायत आहेत त्यात काम करणारा कामगार शंभर टक्के मागासवर्गीय विशेष एस सी,एसटी आहे.पण संघटना युनियन भाजपा शिवसेना पक्षांच्या विचारांच्या आहेत. अनेक वरिष्ठांना जेष्टना आवर्जून भेटी घेतल्या याबाबत माहिती घेतली असता. समाजाला नेतृत्व चांगले मिळाले नाही. गावकी भावकीच्या पलीकडे कोणत्याही संघटना नाही. त्यातील संघर्ष मूळ समस्या पेक्षा भयंकर आहे. इतिहास वाचला तर इतिहास घडविला येतो असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याचे सांगितल्या जाते.
    स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे काय ?.अजून समजलेच नाही. मी १९८२ पासून असंघटित नाका कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी किर्याशील कार्यकर्ता म्हणून काम करतो.विजय सातपुते यांच्यामुळेच विचार करण्याची पद्धत बदलली.वाचन अभ्यास असल्या शिवाय परीक्षा देता येत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याग,कष्ट आणि जिद्द लागते.

    आईच्या पोटातून लीडर जन्माला येत नाहीत. ते घडवावे लागतात.दगडाला खूप घाव सोसावे लागतात तेव्हाच त्याच दगडाची मूर्ती आकार घेते त्याला देव समजल्या जाते.
    लीडर बनण्यासाठी संघटन,वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल आत्मसात करून घ्यावे लागते,एका दिवसात,महिन्यात, वर्षात ते आत्मसात होत नाही. लीडर मध्ये काही गुण असणे आवश्यक असतात.ते कार्यातून कृतीतून दिसतात.त्यांची चर्चा होत असते. त्यामुळेच तो लीडर म्हणून ओळख निर्माण करतो.१) दूरदृष्टी (vision) लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते.२) ध्येयनिश्चिती (Goals) लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत.३) आत्मविश्वास (Self Confidence) ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते. ४) अनुशासन (Discipline) एक चांगला लीडर एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे. ५) चिकाटी (Persistance) कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते.

    ६) नियोजन (Planning) नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते. ७) योग्य निर्णय (ProperJudgement) लीडरला सर्वांची बाजू ऐकून,सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे.८) धैर्य (Patience) नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी
    अंमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते.९) जबाबदारी स्वीकारणे (Accept Responsibilities) नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते. १०) बदलाचा स्वीकार (Accept changes) बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना,आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे. ११) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा (Be A Coach & Guide) प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे.प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे.

    १२) आकर्षक व्यक्तिमत्व (Pleasing Personality)
    एक लीडर म्हणून तुमच्यावर,तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद व संपर्क पाहिजे.१३) प्रशासनिक कौशल्य (administrative skills) एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे. १४) संभाषण कौशल्य (Communication skills) एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे संभाषण कौशल्याची क्षमता.१५) निर्णय घेण्याची कला (Decision making ability) एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे.१६) जोखीम घेण्याची क्षमता (Risk Taking Ability) नेतृत्व करताना धैर्याबरोबरच जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे. १७) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक (Creativity and Innovation) हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत. १८) समस्या सोडविण्याचे कौशल्य (problem solving skills) खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच.१९) लवचिक आणि अनुकूल क्षमता (Flexibility And Adaptability) लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे.२०) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य (Time Management Skills) लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे.

    २१) लोकांना प्रोत्साहित करा ( Motivate People)लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.२२) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे. (Lead By Example) कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी२३) टीम प्लेयर्स व्हा ( Be Team Players) लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.
    संघटनेचे महत्व आपण हातांच्या बोटासारखे राहिले पाहिजे. कोणतेही बोट दुसऱ्या बोटासारखे नसते ‘ पण तरीही एखादी वस्तु उचलताना ती बोटे एकत्र येतात. पांच बोटे चौदा कांडे एकत्र आले तर ती हजारो कामे करतात. कारण एकत्र आल्यावर ती फक्त बोटे कांडे राहत नाहीत तर एक संघटीत मुठ बनते. ही मुठचं एक शक्ती होऊ शकते. अन् वेळप्रसंगी ठोसा देऊन आलेल्या प्रसंगावर मात करू शकते. बोटे म्हणजे माणसे अन् मुठ म्हणजे संघटना.त्याचे जो नेतृत्व करतो तो असतो लीडर. म्हणजे जी शक्ती एका माणसात नाही ती संघटनेत आहे.ती कुठे,कधी कशी वापरावी याचे ज्याला ज्ञान असते तोच खरा लीडर असतो. म्हणुनच एकतेचे, संघटनेचे, महत्व लक्षात घेऊन सर्वांनी संघटीत राहीले पाहिजे.आणि लीडरशिप तयार केली पाहिजे. कोणती संस्था, संघटना वन मॅन शो नसावी म्हणून दोन,तीन किंवा पांच वर्षांनी निवडणूका होत असतात. तो नियम सर्वांना सारखा असतो. म्हणूनच आईच्या पोटातून लीडर जन्माला येत नाहीत. ते घडवावे लागतात.हा प्रत्येक संस्था, संघटना, युनियन,पक्षांना नियम लागू असतो.जे यानियमांचे पालनकरतो तोच यशस्वी होत असते. स्वतंत्र मजदूर युनियन ही क्रांतिकारी विचारांची आंबेडकरी कामगार चळवळ राष्ट्रीय पातळीवर उभी राहतांना दिसत आहे.

    ✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
    अध्यक्ष:- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य