चंद्रपूर जिल्ह्यात (दि.31मार्च) रोजी 24 तासात 208 कोरोनामुक्त 280 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.31 मार्च):-जिल्ह्यात मागील 24 तासात 208 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 280 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 757 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 270 झाली आहे. सध्या 2061 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 73 हजार 750 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 42 हजार 144 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये बाबुपेट, चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 426 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 386, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 280 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 100, चंद्रपूर तालुका 34, बल्लारपुर 24, भद्रावती सात, ब्रम्हपुरी 32, नागभीड 34, सिंदेवाही तीन, मूल एक, गोंडपिपरी पाच, राजूरा सात, चिमूर नऊ, वरोरा सहा, कोरपना 13, जीवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.