चंद्रपूर जिल्ह्यात (दि.6मे) रोजी 24 तासात 2126 कोरोनामुक्त, 1508 कोरोना पॉझिटिव्ह तर 15 कोरोना बाधितांचा मृत्यू

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 2126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1508 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 67 हजार 939 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 50 हजार 805 झाली आहे. सध्या 16 हजार 98 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 1 हजार 153 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 27 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जीवन ज्योती कॉलनी परिसरातील 51 वर्षीय पुरुष, नगीना बाग येथील 72 वर्षीय महिला, बालाजी वार्ड परिसरातील 83 वर्षीय महिला, तुकूम परिसरातील 48 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 53 व 60 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील 34 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील 58 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही येथील 78 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 82 वर्षीय पुरुष, वणी-शिवपुर येथील 67 वर्षीय पुरुष, मारेगाव-यवतमाळ येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1036 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 957, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 33, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1508 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 466, चंद्रपूर तालुका 152 , बल्लारपूर 127, भद्रावती 108, ब्रम्हपुरी 56, नागभिड 26, सिंदेवाही 42, मूल 76, सावली 42, पोंभूर्णा 03, गोंडपिपरी 37, राजूरा 52, चिमूर 49, वरोरा 118, कोरपना 119, जिवती 22 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 542 कोरोनामुक्त तर 6 मृत्यूसह आज (6 मे ) 562 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.6मे):- आज जिल्हयात 562 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 542 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 24160 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 19077 वर पोहचली. तसेच सद्या 4594 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 489 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 6 नवीन मृत्यूमध्ये 81 वर्षीय महिला वडसा, 35 वर्षीय पुरुष खेडेगाव ता.कुरखेडा, 74 वर्षीय पुरुष आर्शीवाद नगर गडचिरोली , 61 वर्षीय पुरुष सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली, 44 वर्षीय पुरुष हिवरगाव ता.चामोर्शी, 80 वर्षीय पुरुष रैगुंटा ता.सिरोंचा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.96 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.01 टक्के तर मृत्यू दर 2.02 टक्के झाला.

नवीन 562 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 195, अहेरी तालुक्यातील 43, आरमोरी 65, भामरागड तालुक्यातील 11, चामोर्शी तालुक्यातील 47, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 24, कोरची तालुक्यातील 24, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 36, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 22 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 63 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 542 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 160, अहेरी 52, आरमोरी 52, भामरागड 0, चामोर्शी 80, धानोरा 11, एटापल्ली 1, मुलचेरा 13, सिरोंचा 0, कोरची 50, कुरखेडा 56 तसेच वडसा येथील 67 जणांचा समावेश आहे.