चंद्रपूर जिल्ह्यात (दि.7मे) रोजी 24 तासात 1642 कोरोनामुक्त, 1449 कोरोना पॉझिटिव्ह तर 23 कोरोना बधितांचा मृत्यू

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7 मे):-जिल्ह्यात मागील 24 तासात 1642 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1449 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 69 हजार 388 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 52 हजार 447 झाली आहे. सध्या 15 हजार 882 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 4 हजार 847 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 30 हजार 976 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील हनुमान नगर तुकूम येथील 70 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, रामनगर परिसरातील 65 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष, 45, 58, 62 वर्षीय पुरुष ,65,55 व 72 वर्षीय महिला, मारेगाव चंद्रपूर येथील 45 वर्षीय महिला,राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील व्याहाड येथील 74 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील 53,56 व81 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1059 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 977, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 36, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1449 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 392, चंद्रपूर तालुका 81 , बल्लारपूर 72, भद्रावती 149, ब्रम्हपुरी 52, नागभिड 22, सिंदेवाही 38, मूल 32, सावली 31, पोंभूर्णा 18, गोंडपिपरी 65, राजूरा 117, चिमूर 55, वरोरा 161, कोरपना 145, जिवती 01 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 611 कोरोनामुक्त तर आज (7 मे) 17 मृत्यूसह 427 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.7मे):-आज जिल्हयात 427 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 611 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 24587 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 19687 वर पोहचली. तसेच सद्या 4394 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 506 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 17 नवीन मृत्यूमध्ये 47 वर्षीय पुरुष देलोडो ता.आरमोरी, 60 वर्षीय महिला आलापल्ली ता.अहेरी, 55 वर्षीय महिला अंकिसा ता.सिरोचा , 40 वर्षीय पुरुष मुर्झा ता.गडचिरोली, 65 वर्षीय पुरुष कोरेगाव ता.वडसा, 72 वर्षीय पुरुष वडसा, 52 वर्षीय पुरुष ता.शिंदेवाही जि.चंद्रपूर, 52 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 64 वर्षीय पुरुष लेढारी ता.कुरखेडा, 50 वर्षीय पुरुष कॉम्प ऐरिया गडचिरोली, 54 वर्षीय पुरुष अंकिसा ता.सिरोंचा, 28 वर्षीय पुरुष मेढेवाडी ता.आरमोरी, 40 वर्षीय महिला महागाव ता.अहेरी, 45 वर्षीय पुरुष हेटीनगर ता.कुरखेडा, 40 वर्षीय पुरुष घारगाव ता.चामोर्शी, 50 वर्षीय महिला श्रीरामनगर कुरखेडा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.87 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला.

नवीन 427 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 146, अहेरी तालुक्यातील 30, आरमोरी 44, भामरागड तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 50, धानोरा तालुक्यातील 20, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 28, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 09, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 39 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 611 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 178, अहेरी 36, आरमोरी 43, भामरागड 18, चामोर्शी 33, धानोरा 25, एटापल्ली 36, मुलचेरा 22, सिरोंचा 50, कोरची 42, कुरखेडा 41 तसेच वडसा येथील 87 जणांचा समावेश आहे.