महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकानी कामाला लागावे – मा राज्यमंत्री बदामराव आबा पंडित

35

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.21जुलै):-महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी जनसेवा करत कामाला लागावे असे प्रतिपादन गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील आयोजित शिव संपर्क अभियान प्रसंगी मा राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी व्यक्त केले आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बाप्पू खांडे, शिवसेना ता प्रमुख कालिदास नवले , शिवसेना मा प्रमुख अजय दाभाडे , महिला आघाडी जि प्रमुख संगीता चव्हाण, डॉक्टर श्रीनाथ तौर आदींनी मनोगत व्यक्त केले

सविस्तर आसे कि शिवसेना बीड जिल्ह्याच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय सक्षम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 20/7/2021 रोजी जातेगाव शिवसेना च्या वतीने बाजार तळावर शिव संपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बाप्पू खांडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, शिवसेना ता प्रमुख कालिदास भाऊ नवले, मा शिवसेना तालुका प्रमुख अजय भैय्या दाभाडे, युवा नेते नितीन भैय्या धांडे ,रोहित भैय्या पंडित, यशराज भैय्या पंडित, उपजिल्हाप्रमुख बब्बलु खराडे, शिवसेना ता संघटक भागवत आबा आरबाड, डॉ श्रीनाथ तौर, मा सरपंच मुकुंद बाबर, युवा नेते जगदीश मस्के किशोर आर्दड, अशोक तौर, ता उपप्रमुख धर्मराज भैय्या आहेर ,साहिल भैय्या देशमुख, आदी उपस्थित होते.

यावेळी शिव संपर्क अभियानात बोलताना मा राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की महाराष्ट्र राज्यात सत्ता शिवसेनेची आहे प्रत्येक शिवसैनिकांनी जनसेवा करत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे शिवसेना सध्या महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष असून बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन करायची आहे शिवसैनिकाने ताकतीने कामाला लागावे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बाप्पू खांडे म्हणाले की गेवराई तालुक्याचे लोकनेते मा राज्यमंत्री बदामराव पंडित यांचे येणारे दिवस चांगले असतील असे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रवेशावेळी म्हणाले आहेत तालुक्यामध्ये सदैव जनतेचे आमदार म्हणून मा बदामराव पंडित याच्याकडे पाहिले जाते शिवसेनेची सत्ता आहे शिवसैनिकाने गोरगरिबांच्या सेवेत सदैव राहून शेतकऱ्यांसाठी योजना राबवून शिवसैनिकानी पक्ष बांधणी करावी असे ही कुंडली बापू खांडे आवर्जून म्हणाले..

शिवसेना ता प्रमुख कालिदास भाऊ नवले यांनी सांगितले की लोकनेते बदामराव आबा पंडित सदैव जनतेचे आमदार आहेत जनतेची सेवा करण्यासाठी अर्ध्या रात्री फोन उचलणारा नेता आणि गोरगरिबांच्या सेवेत सदैव असणारा नेता म्हणून बदामराव पंडित यांची ओळख आहे येणाऱ्या काळात शिवसेनेची सत्ता जिल्हाभरात आपल्या ला खेचून आणायची आहे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचे हात बळकट करायचे आहेत शिवसैनिकानी कामाला लागावे असे ही शिवसेनेचे तालुका प्रमुख कालिदास भाऊ नवले म्हणाले यावेळी डॉ श्रीनाथ तौर , ज्येष्ठ नेते लगड बापू, जातेगाव चे ज्येष्ठ नेते महादेव आण्णा धोंडरे, सुदर्शन मोरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन शिवसेना सर्कल प्रमुख नितीन पवार यांनी तर आभार युवा नेते अभय पांढरे यांनी मानले शिव संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी ता संघटक भागवत आबा आरबड, महादेव आण्णा धोंडरे, मा ग्रापं सदस्य गोरख भाऊ चव्हाण, ग्रापं सदस्य अभय चव्हाण, राजू महाराज चव्हाण, नारायण उर्फ आमदार चव्हाण, अमोल धोडरे, मा ग्रापं सदस्य जातेगाव सुरेश कारके , अविनाश चव्हाण, भैय्या डुकरे, यांनी परिश्रम घेतले युवा नेते अशोक राव तौर, सोशल मीडिया प्रमुख जातेगाव राजेभाऊ नाडे, गोविंद तौर, गणेश देशमुख भारत पांढरे,