मुस्लीम वस्त्यांमध्ये अचानक शाखा उघडण्यामागे आरएसएसचे कुठले षडयंत्र?

56

एका बाजूला मुस्लीमांचा वाढणार्‍या संख्येबाबत विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांच्या आरएसएसने चित्रकुटच्या शिबीरात चर्चा केली, मात्र दुसर्‍या बाजूला मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये शाखा सुरू करण्याचा निर्णय आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी जाहीर केला आहे.आरएसएस आणि मुस्लीम समुदाय हे परस्परविरोधी दोन टोके आहेत. कारण याच आरएसएसने गेली अनेक वर्षे भारतातील लोकांना मुस्लीम शत्रू असल्याचे सांगितले आहे. तसा हिंदू नावाच्या खोट्या धर्माची ढाल करून एससी, एसटी, ओबीसीचा मुस्लीमांविरोधात दंगलीसाठी वापर केला आहे. ज्या मुस्लीमबहुल भागात दंगली झाल्या आहेत त्यामागे आरएसएसचा षड्यंत्रकारी मेंदू आहे. आजपर्यंत देशात सुमारे ६५ हजार दंगली झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे मुस्लीमांविरोधात गरळ ओकणार्‍या आरएसएसला मुस्लीम वस्त्यांमध्ये शाखा उघडण्याचे का वाटत आहे. यामागे निश्‍चितच आरएसएसची एक रणनीती असावी. कारण ते डावपेच बदलतात उद्देश मात्र बदलत नाहीत. त्यामुळे त्यांचे डावपेच समजून घेण्याची गरज आहे.

एका बाजूला मुस्लीम वस्त्यात आरएसएसच्या शाखा सुरू करण्यासाठी निर्णय घ्यायचा आणि दुसर्‍या बाजूला मुस्लीमांच्या वाढणार्‍या लोकसंख्येबाबत चर्चा करायची हे दुटप्पीपणाचे लक्षण आहे. यावरून आरएसएसचा मुस्लीमविरोध कायम असल्याचे लक्षात येते. याच आरएसएसने भारतातील लोकांच्या मनावर मुस्लीम दुश्मन असल्याचे बिंबवले आहे. मग कधी आतंकवादीच्या नावाने त्यांना टार्गेट केले आहे. लव्ह जिहाद, मॉब लिचिंग, तीन तलाक, गोहत्या बंदी, लोकसंख्या नियंत्रण, कलम ३७० अशा प्रकारे मुस्लीमविरोधी मुद्दे उपस्थित करत मुस्लीमांना टार्गेट केले. मग मुस्लीमबहुल भागात आरएसएसच्या शाखा उघडल्यानंतर जागरूक मुस्लीम तरूण आरएसएसला जाब विचारतील त्याचे काय? त्याला आरएसएसकडे उत्तर आहे का? केवळ टार्गेट करून थांबले नाहीत तर अक्षरश: मॉब लिंचिंगच्या माध्यमातून मुस्लीमांच्या हत्या करण्यात आल्या. अनेक मुस्लीमबहुल भागात दंगली घडवल्या. त्यात अनेक मुस्लीमांना जाळण्यात आले. त्यात ग्रोध्रा हत्याकांड माहित नसलेला माणूस भारतात तरी नसेल. एवढी भयानक परिस्थिती आरएसएसने भारतात निर्माण करून देशाला अशांततेच्या खाईत लोटले. आरएसएसकडून मुस्लीमांना का विरोध केला जात आहे यामागेही त्यांचे षड्यंत्र आहे.

मुस्लीमविरोध केल्याशिवाय आरएसएसची राजनीती सफल होणार नाही. ज्यावेळी मुस्लीमांना टार्गेट केले जाते त्यावेळी एसी, एसटी, ओबीसी हिंदू नावाच्या खोट्या धर्माखाली ब्राम्हणांच्या कळपात शिरतो, म्हणजे जो अल्पसंख्य विदेशी ब्राम्हणाचे अकाऊंट फुगते. त्याचा त्याला लाभ मिळतो. म्हणून वारंवार आरएसएसकडून हिंदू नावाचा जप चालवला जातो.
मुस्लीमबहुल भागात शाखा उघडण्याचा आरएसएसने का निर्णय घेतला असेल याचे चिंतन करायला हवे. आज देशातील मूलनिवासी बहुजन समाजात जागृती वाढताना दिसत आहे. मुस्लीम समाजही जागृत झाला आहे. हे जागृतीचे काम गेली ४०-४२ वर्षे बामसेफने केले आहे. बामसेफने तर देशाचा शत्रू कोण आणि मित्र कोण याची ओळख करून दिली आहे. त्याचा परिणाम आरएसएसवर झाला आहे. ब्राम्हण कशालाच घाबरत नाही तो केवळ जागृतीला घाबरतो. म्हणून तो नाना तर्‍हेच्या लबाड्या करत असतो. मुस्लीमबहुल भागात शाखा उघडण्यामागेही लबाडी आहे. आता देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला आता कितीही सांगा की मुस्लीम शत्रू आहे म्हणून….लोक ऐकत नाहीत.

उलट ब्राम्हणवादाविरोधात खुलेआमपणे बोलत आहेत. एवढेच नव्हे तर आता मुस्लीमांविरोधात एससी, एसटी, ओबीसीचा दंगलीसाठी वापर करता येत नाही. कारण जागृती वाढली आहे. दिल्ली दंगलीत कपिल मिश्रा नावाचा ब्राम्हण पुढे आला होता. जामिया इस्लामिया विद्यापीठात गोळीबार करणारा गोपाळ नावाचा तरूणही ब्राम्हण आहे. म्हणजे आजपर्यंत देशात अशांतता माजवून नामानिराळे राहणारे ब्राम्हणवादी लोक बिळातून बाहेर येत आहेत. ते स्वत: हिंसाचार करत आहेत. त्यामुळेच आरएसएसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही लोक म्हणतात, बामसेफचे काहीच मीडियात दिसून येत नाही. तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, मीडिया हा ब्राम्हण-बनियांच्या ताब्यात आहे. कुठला मीडिया आपल्याच विरोधातील बातम्या दाखवणार आहे का? तसेच आहे. मीडियात दिसत नाही याचा अर्थ बामसेफचे काम नाही असे होत नाही. बामसेफने केलेल्या जागृतीमुळेच आरएसएस घाबरला आहे. म्हणून मग मोहन भागवत यांना सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे सांगावे लागत आहे.

मुस्लीमबहुल भागात शाखा उघडत असताना मुस्लीमांबाबत आरएसएसला प्रेम वाटत आहे असे मुस्लीम बांधवांनी समजू नये. कारण त्यांच्या मनात मुस्लीमांबद्दल अढी कायम आहे हे लक्षात घ्यावे. म्हणून तर मुस्लीमांच्या वाढत्या संख्येबाबत चित्रकुटच्या शिबीरात चर्चा करण्यात आली. आता मुस्लीमबहुल भागात शाखा उघडून मुस्लीम तरूणांचे डोके बिघडवण्याचे काम सुरू करण्यात येईल. काही मुस्लीम नेते आरएसएसच्या नादाला लागले आहेत. राष्ट्रीय मुस्लीम मंचच्या माध्यमातून आरएसएसने मुस्लीमांमध्ये शिरकाव केला आहे.आज मुस्लिमांकडे योग्य नेतृत्व नाही. म्हणून ते मुस्लिमांना संयम बाळगा ‘सब्र करो’ असे सांगतात. परंतु मुस्लीमांवर होणारा अन्याय कसा रोखता येईल यावर काहीच भाष्य करत नाहीत. मुस्लिमांना असे वाटते की, एससी, एसटी, ओबीसी हिंदू आहेत. परंतु ते खरे नाही. एवढेच कशाला ब्राम्हणदेखील हिंदू नाहीत.

हिंदू हा पर्शियन भाषेतला शब्द आहे. विदेशी युरेशियन ब्राम्हण गेल्या २.५ हजार वर्षापासून एससी, एसटी, ओबीसीच्या पार्श्‍वभागावर मारत आहे. लाथ घालणारा आणि लाथ खाणारा हिंदू कसा असेल? त्यावेळी बुध्दीस्टांना अस्पृश्य बनवण्यात आले. अस्पृश्यांविरोधात घृणा अभियान चालवण्यात आले. तसेच आज प्रथम मुस्लिमांना गैर मुस्लिमांपासून वेगळे करण्यात आले आणि मुस्लिमांविरोधात घृणा अभियान चालवण्यात येत आहे. त्यावेळी बुध्दीस्टांचा नरसंहार करण्यात आला आता मुस्लिमांचा नरसंहार करण्यात येत आहे. यासाठी ते राजसत्तेचा वापर करित आहेत. त्यावेळीही केला जात होता.पश्‍चिम बंगाल, ओडिशा, उत्तरप्रदेश, बिहारमधील सर्व मुस्लिम बुध्दीस्ट होते. आज तक्षशीला पाकिस्तानात आहे. विद्यापीठाची संकल्पना बुध्दीस्ट लोकांची आहे. ज्यावेळी अमेरिका, युरोपमध्ये दगडांवर दगड घासून आग निर्माण केली जात होती, त्यावेळी भारतात रसायनशास्त्र शिकवले जात होते. ब्राम्हणाला हे सर्व माहित आहे. परंतु मुस्लिमांना इतिहास माहित नाही.

मुस्लिमांमध्येही उच्च शिक्षित लोक आहेत. परंतु त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे. मोहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की, अन्याय करणार्‍यांना रोखा. त्यांना मदत करू नका. रोखता आले नाही तर विरोधात बोला. बोलता आले नाही तर मनातल्या मनात तरी विरोध करा. हे सर्व खोटं आहे याचा मनात विचार करा. ज्या यहुदींनी मोहम्मद पैगंबरांना सोडले नाही त्या यहुदींचे वारस ब्राम्हण आज मुस्लिमांना सोडतील का? आज अन्याय करणारा कोण आहे? यावर मुस्लिमांनी विचार करायला हवा. त्यामुळे त्यांनी अन्यायग्रस्ताला मदत करायला हवी. एससी, एसटी, ओबीसी गेली २.५ हजार वर्षापासून अन्यायग्रस्त आहेत. परंतु मुस्लिमांना अद्याप माहित नाही. त्यामुळे मुस्लीम एससी, एसटी, ओबीसीला हिंदू समजून त्याला शत्रू समजत आहे. परंतु मुस्लीमांचा खरा शत्रू ब्राम्हण आहे. केवळ मुस्लीमांचाच नव्हे तर मूलनिवासी बहुजनांचा शत्रू ब्राम्हण आहे. लोकांना गुलामीत ठेवून सत्ता कायम राखायची आहे.

लोकं जागृत होता कामा नयेत, जागृत झाले तर प्रश्‍न विचारतील आणि एक दिवस देशात बंड करून उठतील. देशात ब्राम्हणवादाविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील याची भीती आरएसएला आहे. म्हणून आरएसएसकडून नको ती वक्क्तव्ये येत आहेत. विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की, भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून आर्य व नागलोकांच्या खुनी संघर्षाचा आहे. त्यामध्ये नाग लोकांनी नेहमीच विजय मिळवला आहे. अर्थात नाग लोक कोण येथील मूलनिवासी बहुजन समाज. मूलनिवासी बहुजन समाजात मुस्लीमदेखील आहेत. मुस्लीमांनी ब्राम्हणवादाच्या छळाला कंटाळून इस्लाम धर्म स्विकारला आहे. म्हणून आता खर्‍या अर्थाने लढाई सुरू झाली आहे. या लढाईत नाग लोकांचाच विजय होणार आहे. मग आरएसएसने कितीही षड्यंत्रे करू देत. त्या षड्यंत्राला मूलनिवासी बहुजन समाज उधळून लावणार आहे एवढे मात्र निश्‍चित.

✒️लेखक:-दिलीप बाईत,मंडणगड जिल्हा रत्नागिरी(मो:-९२७०९६२६९८)