डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रोटी फाउंडेशन कार्यालयात पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन

43

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड,प्रतिनिधी)मो:-93738 68284

नांदेड(दि.६डिसेंबर):-भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीमध्ये निधन झाले. त्यानंतर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून पाळला जातो.!भारतातील अस्पृश्यता, दलितांना मिळणारी दुय्यम वागणूक यामधून समाजातील मोठ्या घटकाला बाहेर काढून शिकण्याची, संघटीत होण्याची आणि संघर्ष करण्याची शिकवण देणारे म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रोटी फाउंडेशन भारत संस्थापक अध्यक्ष डॉ रोहित दादा माडेवार यांचे नायगांव येथील मराठवाडा संपर्क कार्यालयात दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नायगांव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.बाचावार साहेब, दैनिक कुलस्वामिनी संदेश वृत्तपत्राचे वि.भा.संपासद संदिप भाऊ कांबळे, रोटी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर, फाऊंडेशनचे महिला आघाडी अध्यक्षा सौ.शामल कळसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदिप जोंधळे लालवंडीकर, गजानन वाघमारे वंझरवाडीकर, शेषेराव वाघमारे नायगांवकर, अमोल वाघमारे , सुभाष पांचाळ, विश्वनाथ पाटील खराडे, इंन्दे, पाटील, संग्राम बेलकर, गणपत इंगळे, गोविंद पोतदार, श्रीमती साकरबाई, सचिन फुलारी, गौतम वाघमारे, गंगाधर पांचाळ, यांच्या सह आदी रोटी फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थितीत होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक तसेच प्रेरणादायी आहेत भारताच्या सर्वांगीण विकासासाठी लोकशाहीप्रणीत भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेवर कधीही न फिटणारे उपकार केले आहेत, असे मत रोटी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवर यांनी यावेळी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले,