ग्रामपंचायत निवडणूकित रिपब्लिकन कार्यकर्त्याना जशी ताकद दाखवली तशीच आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा – सौ.सीमाताई आठवले

29

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.18जानेवारी):- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी करून रिपाइंची ताकद दाखविली आहे.ग्राम पंचायत निवडणुकीत काम केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याचे पक्षाध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे.ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जशी ताकद दाखविली तशीच आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवावी.त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई आठवले यांनी केले आहे.

आगामी काळात मुंबई;नाशिक; नवी मुंबई; औरंगाबाद ; नागपूर आदी महानगरांच्या महापालिका निवडणुका होत आहेत. या सर्व महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवलेसाहेबांचे हात मजबूत करा; रिपब्लिकन पक्ष मजबूत करा असे आवाहन सौ सीमाताई आठवले यांनी केले आहे.

राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीचा आज निकाल लागला असून त्यात अंदाजे किमान 4 हजार सदस्य रिपाइं चे निवडून आले असल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर ते अहमदनगर आदी अनेक जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे.अक्कलकोट तालुक्यातील बागेहल्ळी गावात रिपाइं चे सर्व पॅनल स्वबळावर निवडुन आले असून प्रस्थापित पक्षांना या गावात रिपाइंने जबरदस्त धक्का दिला आहे. रिपाइं च्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन सौ.सीमाताई आठवले यांनी केले आहे.