बिलोलीचे तहसिलदार यांना अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द,निराधार यांच्या संयुक्तपणे दि २३ मार्च २१ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला

32

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.13मार्च):- तालुक्यातील भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टे धारक शेतमजूर यांच्या जमीन हक्काच्या लढाईसाठी दि १२ मार्च २१ रोजी अखिल भारतीय किसान मजदूर सभा केंद्रीय सचिव अशोक घायाळ व दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली नादेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिल कार्यालय येथे एका दिवसाचे धरणे आंदोलन खालील प्रश्नासाठी आयोजित करण्यात आले त्यांचाच एक भाग म्हणून बिलोली तहसिलदार साहेब व पोलिस निरीक्षक साहेब बिलोली यांना निवेदन देण्यात आले.

🔹मागण्या :- १) शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराण पट्टेधारक बांधवांच्या नावावर देण्यात यावे.
२) दिव्यांगाना स्थानिक स्तरावर पाच टक्के निधी तात्काळ वाटप करण्यात यावा.
३) ग्रामीण भागातील गोरगरिबांना तिनशे दिवसाचा रोजगार तात्काळ देण्यात यावा
४) दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणारे वेतनात दोनवेळा दुधाचा खर्च भागत नाही त्या एक हजार रूपये कसे जीवन जगतील त्यासाठी महागाईच्या काळात दरमहा दहा हजार रुपये दिले तर, त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील त्यांची हालअपेष्ठा थांबतील ते वेळेवर देण्यात यावे.

ईत्यादी मागण्या संदर्भात शासन,प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कोव्हिडचे शासनाच्या नियमाचे पालन करून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदन अखिल भारतीय किसान मजदूर सभा ता अध्यक्ष गंगाधर वाघमारे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, विठल कांबळे,अनिल सुर्यवंशी ईत्यादी कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे दिले असे प्रसिध्दी पञक देण्यात आले.