प्रा.शिवराज बांगर पाटील व अनिल डोंगरे यांच्या मध्यस्थीने डीघोळ आंबा येथील भूमीहीन शेतकऱ्यांचे उपोषण मागे

34

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो:- 8080942185

अंबाजोगाई(दि.5जून):- तालुक्यातील डिघोळआंबा येथील भूमीहीन शेतकरी गेल्या चार दिवसापासून अक्षयजी भुंबे यांच्या नेतृत्वाखाली मा. उपजिल्हाधिकारी कार्यालय आंबेजोगाई या ठिकाणी उपोषण करत होते पडत्या पावसामध्ये हे भूमिहीन आपल्याला कसण्यासाठी देवस्थानाची जमीन द्यावी व जाहीर लिलाव मध्ये त्यांनी जाणीवपूर्वक बोली वाढवून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाई करावी.

या मागणीसाठी हे लोक उपोषण करत होते आंबेजोगाई येथे जावुन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर पाटील व अनिल डोंगरे यांनी मा.उपजिल्हाधिकारी साहेबांची भेट घेत सर्व विषयावर चर्चा केली जाणीवपूर्वक वाढवलेली लिलावाची रक्कम न भरणाऱ्या व्यक्तीवरती अनामत रक्कम जप्त करून कारवाई करायची मागणी करत, लिलावाची प्रक्रिया पुन्हा एकदा पार पाडण्याची मागणी केली असता प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संबंधितांचे उपोषण सोडण्यात आले याप्रसंगी आंबेजोगाई शहराध्यक्ष अमोल दादा हातागळे ,लग्न वैद्य, नितीन सरवदे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.