भारतीय सैन्यदलात सामील झालेल्या तीन भूमिपुत्रांचे येवला शहरात जंगी स्वागत

28

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.२४ऑक्टोबर):-चिंचोडी येथील ३ जवान भरतीय सैन्य दलात सामील होऊन एक वर्ष झाले आहे आज बाबासाहेब गुंजाळ रा. चिंचोडी यांची १४ महार बटालिय मध्ये तर समाधान आत्माराम झालटे यांची १५ महार बटालियन तर रहुल शांतराम भारस्कर यांची देखिल १५ महार बटालियन मध्ये निवड झाली या तिघांचीही जम्मू कश्मीर मध्ये पोस्टिंग झाली आहे या तिघांना ही एक वर्षी नंतर घरी परतल्याचा आनंद होतानी दिसत होता.

त्यांनी प्रथमतः विंचूर चौफुली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण केले त्यांचे स्वागत करतानी फटाक्यांची अतिष बाजी केली चिंचोडी कर आणि येवले करानी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले यांच्या स्वागतासाठी चिंचोडीचे सरपंच रवि गुंजाळ उपसरपंच नंदकुमार घोटेकर, समाधान मढवाई, सागर गुंजाळ (पोलिस), साईनाथ गुंजाळ, दत्तू माळी आदि ग्रामस्त व मित्र परिवार उपस्तित होते.