भारतात शिगेला पोहोचणार कोरोनाची तिसरी लाट?

31

🔸दररोज येणार 7 लाखाहून अधिक नवे रुग्ण

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.26जानेवारी):-जगभरासह भारतात देखील आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशाची खूप चिंता वाढली आहे. मात्र, देशात काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येत घट होतानाही दिसत आहे. त्यामुळे तिसरी लाट ओसरत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जानेवारीच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असा अंदाज , विशेषतज्ञांनी लावला होता. हा अंदाज चुकीचा होता का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. मात्र, नवीन अभ्यासानुसार, भारतात 23 जानेवारीला कोरोनाची प्रकरणं शिगेला पोहोचली. याकाळात देशात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्णसंख्या नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अपडेट आकडेवारीनुसार, देशातील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 8,209 पेक्षा जास्त प्रकरणं आढळून आली आहेत. यातील 3,109 लोक कोरोनामुक्त झाले आहेत किंवा इतर ठिकाणी निघून गेले आहेत.आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 19.65 टक्के आणि साप्ताहिक दर 14.41 टक्के नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत तब्बल 3,52,37,461 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आणि कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर कोरोनातून बरं होणाऱ्यांचा दर 94.27 टक्के आहे.आता सावधान… राहीले पाहिजे. मुलांना सांभाळले पाहिजे कारण मुलांमध्ये ओमायक्रॉनची नवी लक्षणं सुरू झाली आहेत.

आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल यांच्या मते, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भारतातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपेल. आयआयटी कानपूरच्या सूत्र मॉडलनुसार, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र कोरोनाची लाट उच्चांक गाठेल.
याबाबत बोलतांना एक्सपर्ट आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल म्हणाले, की देशातील मेट्रो सिटीबाबत सूत्र मॉडलचा केलेला अभ्यास बरोबर नाही. कोरोना टेस्टबाबत आलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे टेस्टची संख्या कमी झाली आहे, यामुळे रुग्णसंख्या कमी येत आहे. उदाहरण म्हणून पाहायचं झाल्यास दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट १५ ते १६ जानेवारीला उच्चांकावर असेल, असे सांगण्यात येत होतं. गणितीय मॉडलनुसार, या काळात दररोज ४५ हजार नवे रुग्ण समोर येणार होते. मात्र, या काळात प्रत्यक्षात हा आकडा २८ हजाराच्या जवळपास राहिला. मुंबईतही १२ जानेवारीला कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असं सांगण्यात येत होतं. कोरोना प्रकरणांबद्दलचा हा अंदाज 72 टक्क्यांपर्यंत बरोबर आल्याचं चित्र आहे.दरम्यान, हा अंदाज कितपत खरा ठरेल हे सांगता येत नसले तरी सध्याची स्थिती पाहता, विशेष काळजी घेणे अतिशय महत्वाचं आहे.