वादळी वाऱ्याचा राधानगरीला मोठा फटका

62

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.26मार्च):-गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे राधानगरी महाविद्यालयाच्या संगणक विभाग व कार्यालयाचे छप्पर उडून गेले व लाखो रुपयांचे नुकसान झाले. चार खोल्यांचा पत्रा उडून गेल्यामुळे बारा संगणकांसह सहा ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सुशील पाटील (कौलवकर) व प्राचार्य डी.एस.मोरुस्कर यांनी केली आहे.

गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास झालेल्या वादळाने कार्यालयावरील सर्व पत्रे उडून गेले त्यानंतर झालेल्या पावसात कार्यालयातील सर्व संगणक, महत्त्वाची कागदपत्रे भिजली. फर्निचर,सीलिंग व अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.