पावसाळ्यात ताप व सर्दी-पडसं होऊ नये म्हणून आयुष मंत्रालयाने दिल्यात काही खास घरगुती टिप्स!

38

पावसाळा (Monsoon season) आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. जेव्हा शरीर या बदलला प्रतीकूल होतं तेव्हा शरीराला ताप, सर्दी, खोकला (Flu and cold-cough) यांसारख्या सामान्य आजारांना सामोरे जावे लागते. या शिवाय अन्य जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचा सुद्धा धोका असतो. मलेरिया आणि डेंग्यू सारख्या तापाच्या साथीमुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे दरवर्षी सरकारतर्फे काही चोख उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात ज्या जनतेला तापाच्या आजरापासून दूर ठेवतात.
हळदीच्या दुधाबद्दल तुम्ही सुद्धा एकून असालच. ताप आपल्यावर अनेक भागांत हमखास हळदीचे दुधच प्यायला दिले जाते. उन्हाळ्यात हळदीचे दूध कोणी फार पीत नाही पण पावसाळा आलं की ते पिण्यावर जास्त भर दिला जातो. कारण या काळात ताप, सर्दी खोकला यांपासून तुम्हाला आराम मिळवून देण्याचे काम हळदीचे दूध करते. असे म्हणतात एक या सर्व आजारांपासून बचाव करायचा असेल आणि हे आजार कधी होऊ नये असे वाटत असेल तर दिवसातून एकदा आवर्जून हळदीचे दूध प्यावे. एक लक्षात ठेवा एक ग्लास दुधामध्ये थोडीच हळद मिसळायची असते. पूर्ण एक चमचा भरून हळद टाकायची नसते.
तुम्ही अनेकांना हे म्हणताना ऐकलं असले की पावसाळ्यात फक्त गरम पाणीच प्यावं आणि हा सल्ला अतिशय मोलाचा आहे. पावसाळ्यात पाणी दुषित होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय अधिक थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला ताप, सर्दी खोकला होण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणून पावसाळ्यात शक्य तितके उकळून पाणी प्यावे. याशिवाय सर्दीमुळे नाक बंद झाले असल्यास आणि घसा खूप दुखत असल्यासही गरम पाणी उपयुक्त ठरते. या व्यतिरिक्त तुम्ही गरम पाण्यात विक्स किंवा पुदीना टाकून त्याची वाफ घेऊ शकता. याशिवाय जर इसेंशीयल ऑईल जसे की लवंगाचे तेल, टी-ट्री ऑईल, लेमन ग्रास ऑईल यांचे मिश्रण करून त्याची वाफ सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
पावसाळ्यात होणाऱ्या तापाची काही खास लक्षणे असतात. आज आम्ही तुम्हाला त्यापैकीच काही 6 लक्षणे सांगणार आहोत. जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण आढळले तर तुम्ही आवर्जून उपचार घ्यावेत. श्वास घेण्यात अडचण, नाक बंद होणे, खोकला, अंगदुखी होणे, डोकेदुखी, स्नायुंमध्ये ताण निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ घरगुती उपचार घ्यावे, जर त्रास वाढतच गेला तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
घरबसल्या पावसाळी तापापासून स्वत:चा बचाव कसा करावा या विषयी सांगताना जाणकार सांगतात की जस जसा पावसाळा जवळ येतो तस तशी आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज भासू लागते. कारण या काळात विषाणू आणि जंतू यांचा प्रभाव वाढतो आणि ते अधिक त्वेषाने आपल्या शरीरावर व आरोग्यावर हल्ला करू शकतात. अशावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे संतुलित आणि स्वच्छ आहार घेणे, बाहेरचे न खाणे आणि गरम पाणी शक्य तितके जास्त पिणे. पाणीच तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्वाधिक मदत करू शकते.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गरम पाण्यात पुदिन्याची पाने आणि ओवा मिश्रण करून त्याची वाफ घ्यावी. ही वाफ खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवून देऊ शकते. याशिवाय पुदिना, ओवा, कापूर, निलगिरी मिक्स करून तयार केलेला आयुर्वेदिक लेप गळ्यातील खसखस, खोकला, जळजळ इत्यादी समस्या दूर करू शकतो. हा लेप सर्दी आणि तापाला सुद्धा दूर ठेवतो. हा लेप गरम पाण्यात मिसळून त्याची वाफ घ्यावी. लक्षात ठेवा पाणी गरम करायचे आहे उकळवायचे नाही आहे.