अवलमारी येथील चमत्कारिक पर्यटन स्थळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेपणामुळे उपेक्षित

387

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.26डिसेंबर):-अहेरी तालुक्यातील व्यंकटापुर जवळ अवलमारी हे गाव असून, गावापासून ५०० मीटर वर एक अदभुत अश्या प्रकारचा चमत्कारिक पाण्याचा कुंड आहे. कुंडाजवळ टाळी किंवा जोराने आवाज केल्यास त्या कुंडामधून स्वच्छ पाण्याचा प्रवाह बुळबुळ असा उखडत्या पाण्यासारखा पाण्याचा प्रवाह वाढतो. निसर्गाचा अदभुत चमत्काराचा नमुना या कुंडा कडे पाहिला जाते. या कुंडातून बारमाही उन्हाळ्यात सुध्दा तेवढाच पाणी वाहत असतो.

दिनांक २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी त्या भागाचा दौरा करून या स्थळाला भेट दिली असता, त्या कुंडापर्यंत जाण्यास मार्ग नाही. तसेच या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी कुठल्याच लोकप्रतिनिधी चा विकास करण्यास दिसून येत नाही.

या पर्यटन स्थळाला चालना चालना दिल्यास वेगवेगळ्या भागातील पर्यटक या स्थळाकडे आकर्षित होतील. त्या परिसरातील लोकांना रोजगार मिळून त्यांचा आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे या पर्यटन स्थळाचा विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केले आहे.