महायुतीमध्ये २४ तासाच्या आतच पडली साताऱ्यात पहिली ठिणगी

7224

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.15जानेवारी):- छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा येथील राजवाड्यासमोर गांधी मैदानावर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला 24 तासातच ठिणगी पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.

आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्वासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भूमिका मांडली. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील ठाणे – मुंबई शहरात आलेल्या कष्टकरी कामगार व त्यांची मुलांचे चांगल्या पद्धतीने वैचारिक संगोपन केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकवला. यामध्ये कुणीही प्रस्थापित घराण्यातील व्यक्ती नव्हती.

आज महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेची सत्ता आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरू झालेली आहे. महिला वर्गाला एसटीमध्ये अर्ध तिकीट ,जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, वेळेत कर्ज पुरवठा व कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान, सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे .त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा खासदार निवडून येणे मध्ये कोणती अडचण नाही.

अशा वेळेला सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा शिवसैनिकांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार बनवले पाहिजे. कारण, ही किमया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्ह्यातील माननीय शिवसेनेचे खासदार हिंदुराव निंबाळकर व आमदार सदाशिव सकपाळ व शंभूराज देसाई निवडून आले होते आणि यापुढेही शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी प्रत्येक इच्छुक उमेदवार हा लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहे.

पण, मतदारांचाही कौल महत्त्वाचा आहे .ज्या सातारा जिल्ह्यातील मतदारांनी कौल दिलेला आहे. त्याचं राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे .एवढीच आमची माफक अपेक्षा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळेला त्यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी व मिळालेले मतदान आणि मिळणारी मतदान याची वस्तुनिष्ठ माहिती पत्रकारांना दिली.