साकोली : २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण साकोलीत कित्येक महिन्यापासून विविध प्रभागात २४ तास दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे हा संतापजनक प्रकार तलाव वार्ड व गणेश वार्डात जलदिनीच २२ मार्चला फ्रिडमने उजेडात आणला. याबाबद जागतिक जल दिनी आणून पाण्याची नासाडी नगरपरिषदेने थांबवावी अशी फ्रिडमकडून मागणी करण्यात होती याची “साकोली मिडीया” व “पुरोगामी न्यूज” ने दखल घेतली तर शनिवार सकाळी १०:३० ला नगरपरिषदेने कर्मचारी पाठवून फुटलेल्या पाईपांची दुरूस्तीचे काम सुरू झाले.
पाणी म्हणजे जीवन मानल जाते. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. पाणी वाचवा जीवन वाचवा या मोहिमेत करोडो रुपये शासन खर्च करीत असते पण साकोलीत या मोहिमेला गालबोट लागून जल दिवसाचा फज्जा उडीत येथे जलदिनाची ऐशीतैशी झाली आहे हे या संतापजनक प्रकारातून दिसून आले. गणेश वार्ड क्र. २ दिपक थानथराटे यांच्या घरासमोर पाण्याचे पाईप महिन्यापासून लीक आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. दूसरा प्रकार तलाव वार्डात कितीतरी महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक बोअरवेलचे दररोजच २४ तास सतत हजारो नाही तर लक्ष आणि अब्ज लिटर पाणी वाया गेले व आजही जातच आहे. या संतापजनक प्रकारावर नगरपरिषदेचे का लक्ष नाही असा सवाल फ्रिडमचे किशोर बावणे व आशिष गुप्ता यांनी केला. तातडीने या अति गंभीर प्रकारावर लक्ष देऊन ही दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबवावी अशी २२ मार्च जागतिक जलदिन दिवशी फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, गणेश वार्डातील दिपक थानथराटे, निखिल तनवाणी, भूषण बावणे, सतीश नंदुरकर, प्रज्योत ब्राह्मणकर, शैलेश शिंगोर, मयूर सोनवणे, सतीश पवार, रोहित जागीया, सुरेश चचाणे तलाव वार्डातील अमित लांजेवार, आनंद गायकवाड व जनतेने पाणी वाया चाललेल्या घटनास्थळी येऊन नगरपरिषदेकडे ही मागणी केली आहे.