रब्बीच्या हंगामात खरिपाची पाहणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – विश्वनाथ शिंदे मांजरमकर

38

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.16डिसेंबर):-मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. जवळपास मराठवाड्यातील 20 ते 30 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक 20 आणि 21 डिसेंबर रोजी मराठवाड्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाचा हा पाहणी दौरा म्हणजे ‘एका प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच ‘ असच म्हणावं लागेल. मराठवाड्यात यावर्षी पावसाने अपेक्षा पेक्षा अधिक हजेरी लावली. यामुळे मुग,कापुस, सोयाबीन, ऊडीद, तूर याचं मोठं नुकसान झालं. त्यांनतर राज्य सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.

त्यात आता केंद्रीय पथक पाहण्यासाठी येणार आहे. खरीप जाऊन आता रब्बीचा आता अर्धा हंगाम झाला आहे. त्यामुळे केंद्रीय पथक पाहणी करणार तरी काय? असा आम्हा शेतकऱ्यांना प्रश्न‌ पडला आहे.’रब्बी’च्या हंगामात केंद्रीय पथक करणार तरी काय ‘खरिपा’ची पाहणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण प्रत्यक्षात मात्र अजूनही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत मिळालेली नाही.

त्यामुळे दिवाळीसारखा सणही शेतकऱ्यांना कडू ठरला. त्यात अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर आता 2 महिन्यांनी केंद्र सरकारचं पथक नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे.राज्याची मदत अजून मिळाली नाही त्यामुळे केंद्राची मदत कधी मिळणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे.केंद्र सरकार एका प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच उडावण्याच काम करत आहे.कृषिप्रधान देशाला ही काळीमा फासणारी घटना आहे असेही मत शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर यांनी व्यक्त केले.