मजूरामार्फत रेती उपसा करून स्थानिकांना रोजगार द्यावा आपचे विजय सिध्दावार यांची मागणी

31

✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मूल(दि.2मार्च):-शाषासनाने मूल तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव करून, रेती उत्खननाची परवाणगी दिली आहे. या रेतीघाटावरील रेतीचे उत्खनन स्थानिक मजूरांमार्फत करून, रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार, तसेच राज्य शासन, ग्रिन ट्रिब्यूनल, प्रदुषण नियंत्रण विभाग यांनी वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार सुर्यादयापूर्वी किंवा सुर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करता येत नाही.

कंत्राटदार मात्र दिवसरात्र, चोविस तास, जेसीबी, पोकलॅंडच्या सहाय्यांने अवैद्यरित्या रेती उत्खनन करून, नियमांचे उल्लंघन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ही रेती स्थानिक मजूरांमार्फत रेतीचा उपसा केल्यास, ज्या गावात रेती घाट आहे, त्या गावातील गावकरी, महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.कोरोणाच्या काळात ग्रामिण मजूरांना रोजगारांची अत्यंत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेता, मूल तालुक्यातील रेती घाटावर मजूरांमार्फतच रेती उपसा करण्यांचे संबधित लिजधारकांस आदेश द्यावे अशी मागणी श्री. सिध्दावार यांनी केली आहे.