भिकाऱ्यांना व मनोरुग्णांना , वेड्यांना काेराेना का होत नाही?

42

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

यवतमाळ(दि.15मे):-काेराेनाचे संकट जगात व देशात मागील दीड वर्षापासून शहरा-शहरात या महामारीचे थैमान घातलेले आहेत,वास्तविक पहाता आज संपुर्णच महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये या रोगाची स्थिती महाभयानकच भयंकर वाढतच चालली आहे पंरतु केंद्र सरकार व प्रत्येक राज्य सरकार काेविड रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे,त्यात राजकारण खूप केल्या जात आहे की काय,? हा रोग किती खरा आणि किती खोटा याबाबत अनेक विचारवंताचे वेगवेगळे मते देखील ऐकायला मिळत आहेत, त्या खोलात आपल्याला जायचं नाही हा रोग खरा आहे समजू परंतु रोज आपल्या देशात व महाराष्ट्रात या महामारी संसर्ग भयंकर रोगाची परिस्थिती पहात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यापुरता विचार आपण केला तरी किंवा प्रत्येकाने आपापल्या शहराचा व तालुक्याचा विचार केल्यास आपल्याला महाभयंकर सत्य लक्षात येईल!

ह्या रोगाचे महामारी च्या संकटात हे महाभयंकर सत्य म्हणजे गावा गावा त शहर तालुक्यात जिल्ह्यात राज्यात व तमाम देशात फिरणारे एकूण करोडो भिकारी मनोरुग्ण व वेड्यांना काेराेना झाल्याचे दिसत नाही यावर काही तज्ञ मंडळी असे म्हणतील की त्यांची तपासणी होत नाही हरकत नाही त्यांची तपासणी जरी होत नसेल तरी मग त्यांना जर रोग होत असेल तर ते जागोजागी ठीक ठिकाणी आजारी ।अवस्थेत रस्त्यावर तडफडताना दिसले असते असे कुठेही सहसा पाहायला मिळत नाही व ऐकण्यात नाही किंवा कोणत्या वृत्तपत्रात किंवा न्यूज चॅनल मधून बातम्या देखील येत नाही भिकारी वेडे मनोरुग्ण या रोगामुळे पाय घासून ठीक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मरून पडलेले देखील दिसत नाही याचे माझ्या सारख्या अल्प बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीला आश्चर्य वाटत आहे.

त्यातही महत्त्वाचे म्हणजे भिकारी वेडे हे मनोरुग्ण आमच्या सारखे स्वच्छ राहत नाही ते सहसा अंघोळ करीत नाही हा त स्वच्छ धूत नाहीत मास्क वापरत नाहीत सेनी टायझर मुळीच वापरत नाही कोणताही डॉक्टर त्यांना तपासत नाही कोणताही मेडिकल दुकानदार त्यांना एकही गोळी देत नाही मिळेल ते अस्वच्छ शिळे दूषित अन्न नेहमी खातात असे असतानाही भिकारी वेडे व मनोरुग्ण यांना काे राेना लागण झाल्याचे सहसा ऐकण्यात आले नाही ह्या भिकाऱ्यांची वेड्यांची मनोरुग्णांची प्रतिकार शक्ती आम्हा सुज्ञ सुशिक्षित सुसंस्कृत सधन व बुद्धिवान सकस अन्न व विविध विटामिन खाणाऱ्या लोकांपेक्षा पावरफूल आहे का?

ही मंडळी सकस अन्न खात नाही कोण तेही व्हिटॅमिन युक्त पदार्थ यांना खायला भेटत नाही मग यांची प्रतिकारक शक्ती आमच्यापेक्षा जास्त पॉवर्फुल कशी राहील? हे जर खरे आहे तर यांना वाचवणार कोण? ईश्वर खुदा की आणखी कोणती शक्ती यांना वाचवत आहे ? सरकारने तर मंदिर मस्जिद गिरजाघर बंद केले आहे मग ईश्वर बाहेर कुठून येईल व ह्या लोकांना वाचविल? हादेखील महत्त्वाचा प्रश्न परंतु हा नैसर्गिक चमत्कार नक्कीच आहे तसे नसेल तर हा प्रकार काय आहे तज्ञांनी खुलासा करावा,,,हेच सत्य आहे असे समजु
~~~~~~~~~~~~~~~~~~