राज्यातील लाकडाऊन ४ टप्प्यात उठवणार काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

31

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.25मे):- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लाकडाऊन कधी उठवणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता ठाकरे सरकार लाकडाऊन उठवताना कोणतीही घाई होणार नाही याची विशेष कादजी घेणार आहे.त्यासाठी राज्यातील लाकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.सूत्रांची माहितीनुसार ठाकरे सरकार १जूनपासून लाकडाऊन उठवण्याची प्रक्रिया सुरू करेल पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडले जातील.

गेल्या काही दिवसांत बंद असल्यामुडे राज्यातील व्यापाऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरू करण्यावर सरकार भर देईल.तर तिसऱ्या टप्प्यात होटेल रेस्टॉरंट बार आणि मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात येतील.त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थडे सुरू केली जातील.याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतली जाईल.

*देशात एकूण कोरोनाबडिंचा आकडा तीन लाखापार*

देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे.आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बधितांच्या संख्येत तब्बल १८हजारांनी घट झाली आहे.