निष्क्रिय मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसचे धरणे आंदोलन – वसंत मुंडे

25

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.1जून):- मागील ७ वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने देशाच्या जनतेचा विश्वास घात केला. सर्वच क्षेत्रात महागाई वाढ केली. पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज, दळणवळण, खाद्यतेल, दाळ, तांदूळ, जिवनाशक वस्तु मध्ये भरमसाट भाव वाढ केली. निवडणुकीत दिलेली आश्वासन एकही पुर्ण केलेले नाही. ६ महिने झाले, ३ काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु कपटी मोदी सरकार शेतकरी नेतृत्वा सोबत चर्चा करीत नाहीत. कामगाराचे नवीन कायदे रद्द करण्यासाठी संघटना सोबत बैठक घेतली जात नाही. नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेचे जिवन जगणे बेहाल झाले.

मोदी सत्तेवर नसून अंबानी, अदानी सरकारची मागील सात वर्षांच्या कारकिर्दीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे गांधी स्तंभ मोढा मैदान परळी येथे काँग्रेस नेते वसंत मुंडे, डॉ सुरेश चौधरी यांच्या नेतृत्वखाली पक्षाच्या राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऑड अनिल मुंडे, गणपत सौंदळे सर, गणपत आप्पा कोरे, प्रकाश देशमुख, विश्वनाथ गायकवाड, सय्यद अल्ताफ, अशोक कांबळे, धर्मराज खोसे, प्रा.नितीन हत्ती, अंबिरे लहुदास तांदळे, ऑड संजय रोडे, शेख सिकंदर शेख जावेद शेख सी. एम.अजीम कुरेशी समीर शेख सय्यद जाफर शेख सिराज यांचा सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.