गुणवंताचा सत्कार म्हणजे कौतुकाची थापच होय- सौ.शुभांगी गुंजाळ

22

🔸९० शाळांतील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.1सप्टेंबर):- नक्षञाचं देणं काव्यमंच, महाराष्ट वतीने दरवर्षी जुन्नर तालुक्यातील सर्व शाळेतील प्रथम पाच आलेल्या विद्यार्थी वर्गाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.गुणवंत सत्कार समारंभाचे सलग हे १५ वे वर्ष आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षपूजन करुन,पाणी घालून करण्यात आले. पर्यावरण संदेश देत आगळ्यावेगळ्या पध्दतीने हा उदघाटन सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमातील पाहुणे स्वागत व प्रास्ताविक कविवर्य रामदास हिंगे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार पुस्तक, गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ
देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम अध्यक्षा जयहिंद शैक्षणिक संकुल डायरेक्टर सौ. शुभांगी गुंजाळ या प्रसंगी म्हणाले, “गुणवंत सत्कारामुळे मिळालेल्या यशाला शब्बासकीची थाप मिळुन यशाचा मार्ग आनंदी होतो.कठोर परिश्रमाला यशाची चंदेरी किनार मिळते.हा उपक्रम गेली पंधरा वर्षांपासुन नक्षञाचं देणं काव्य मंचवतीने संपन्न होत आहे. हे प्रेरणा देण्याचे काम कौतुकास पाञ आहे.

प्रमुख पाहुणे राजकवी डाॅ. ख. र. माळवे यावेळी म्हणाले की, “भारताचे भविष्य हे शाळेत घडत आहे. अशा कौतुक सोहळ्याने या पिढीला भक्कम होण्यास मदत होत आहे. संवेदनशिलता टिकविण्याची जबाबदारी हि संस्था यातुन करत आहे.”

तसेच जयहिंद शैक्षणिक संकुल चेअरमन जितेंद्रशेठ गुंजाळ विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते. ते म्हणाले,”जयहिंद शैक्षणिक संकुल हे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी वर्गासाठी शिक्षण उत्तमप्रकारे घेता यावे. यासाठी कार्य करत आहे, विविध शाखांच्या माध्यमातुन हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत आहे.कौतुकसोहळा हा नेहमी होणे गरजेचे आहे.”

डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृह, जयहिंद शैक्षणिक संकुल,मु. पो,कुरण ता.जुन्नर जि.पुणे येथे हा गुणवंत सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्षा मा.सौ.शुभांगी धर्मेंद्रशेठ गुंजाळ
(डायरेक्टर-जयहिंद शैक्षणिक संकुल), कार्यक्रम विशेष अतिथी आणि मा. श्री.जितेंद्रशेठ गुंजाळ(अध्यक्ष-जयहिंद शैक्षणिक संकुल),मा.श्री.अॅड.प्रफुल्ल भुजबळ महाराज, पुणे
(ज्येष्ठ कायदेतज्ञ व गुरुवर्य) तसेच यावेळी कार्यक्रम विशेष प्रमुख पाहुणे उद्योजक मा. श्री. शुभमशेठ नाईक (प्रमुख- अमर प्रतिष्ठान,महाराष्ट),मा.श्री.विजयशेठ गुंजाळ (सचिव- जयहिंद शैक्षणिक संकुल कुरण) मा. श्री. डाॅ. ख. र. माळवे (राजकवी)
(मा.वरिष्ठ रेल्वे अधिकारी,मुंबई),मा.श्री.डाॅ.दत्ताञय गल्हे
(मुख्य कार्यकारी अधिकारी- जयहिंद शैक्षणिक संकुल कुरण.),
कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा. प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे
(संस्थापक- राष्टीय अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच),मा. श्री.लक्ष्मीकांत काजळे(युवा उद्योजक-ञिमूर्ती ज्वलर्स,जुन्नर), मा. श्री.रमेश खरमाळे (निसर्गप्रेमी,कवी, माजी सैनिक), प्राचार्य डाॅ.किरण पैंठणकर, कवी रवी भोजणे, कवी पियुष काळे इ.मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दहावी नंतर काय ?करिअरच्या विविध वाटांबाबत मार्गदर्शन मा. श्री.प्रा.सुभाष आंद्रे(उपप्राचार्य- जयहिंद औद्योगिक प्रशिक्षण संस्था) यांनी विद्यार्थी वर्गास केले.

या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजननक्षञाचं देणं काव्यमंच, पुणे. जुन्नर तालुका विकास परिषद,जुन्नर अमर प्रतिष्ठान, नारायणगाव ,जयहिंद शैक्षणिक संकुल,कुरण यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास हिंगे यांनी केले. सूञसंचालन कवी वादळकार यांनी उत्तम केले.आभारप्रदर्शन मोहन कुदळे यांनी केले. पसायदान या विश्वगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येक विद्यार्थी वर्गास सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापकांना मोजणी तक्ता, गौरवचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणांत संपन्न झाला.