सचिन पाटील राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराचे मानकरी

28

🔹वाढदिवसानिमित्त डी.जे.राठोड फौंडेशन, व्ही पी ट्रेडिंग व अग्रवाल ज्वेलर्स यांच्याकडून पुरस्कार प्रधान

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.15ऑक्टोबर):- महाराष्ट्रातील आई महालक्ष्मी च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील कसबा वाळवे या छोट्याशा गावचे सुपुत्र सचिन पाटील यांची कोरोना काळातील कामगिरी पाहून डी.जे.राठोड फौंडेशन, व्ही पी ट्रेडिंग व अग्रवाल ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित पाहुणे ए वाय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष), आर वाय पाटील (संचालक मार्केट कमिटी कोल्हापूर), उमेश दादा भोईटे ( संचालक बिद्री साखर कारखाना), युवराज वाकरे (संचालक), जगदीश पाटील (संचालक), सागर पाटील ( सभापती), एकनाथ पाटील (संचालक), नेताजी पाटील (संचालक मार्केट कमिटी), राठोड फौंडेशन व दैनिक जनमत चे उपसंपादक सुरेश राठोड, उद्योजक विकास बिसुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रेरणादायी आणि धाडशी व्यक्तिरेखेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल व कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो असा हा पुरस्कार मिळणाऱ्या काही दिग्गज मान्यवर पैकी सचिन पाटील होते. हा पुरस्कार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका प्रमाणे दोन ते तीन व्यक्तींनाच प्रधान करण्यात येतो.त्यांचे सामाजिक वर्तन व कार्य युवा पिढीसाठी एक ध्येय आहे. जी अडथळ्यांच्या कल्पनेला नकार देते”. ग्रामीण भागात कोरोना काळात कोव्हिड सेंटर उभारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ते खूप बोलके आणि सक्रिय सहभागी होते. ग्रामीण आणि शहरी भागात अशा अनेक आपत्ती काळातील सेंटर उभा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

या त्यांच्या यशाबद्दल बोलताना पाटील म्हणाले,” माझी निवड केल्याबद्दल मी डी.जे.राठोड फौंडेशन,व्ही पी ट्रेडिंग व अग्रवाल ज्वेलर्स यांचा मनापासून आभारी आहे आणि निवड प्रक्रियेने खूप प्रभावित झालो आहे. बहुतेक पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांचे योगदान देणे सुरू केले तेव्हा ते स्वतः संघर्षाच्या टप्प्यात होते. पुढे जाताना, मला महाराष्ट्राच्या आतील भागात असलेल्या कोव्हिड सेंटर सारखे अनेक सेंटर बदलायचे आहेत आणि कोणताही असा मोठा आजार आल्यास प्रत्येकाच्या गावापर्यंत अशी सुविधा मिळावी अशी माझी इच्छा आहे. कारण खरी प्रतिमा तिथे आहे. आम्ही आधीच प्रक्रिया सुरू केली आहे.”पाटील यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे अनेक गोरगरिबांना ते मदतीचा हात देत असतात अनेक लोकांना निस्वार्थपणे सेवा देण्याचे काम सतत त्यांच्याकडून घडत असते. या पुरस्कारा बरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी 2019 – 20 मध्ये ही सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील सामाजिक कद आणि शिक्षणाचे स्तर उंचावण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग, कोरोना काळातील उत्कृष्ट कार्य दर्शवण्याचे कार्य अनंतशांती फौंडेशन चे ट्रस्टी भगवान गुरव यांनी केले, त्यामुळे राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात मदत झाली आहे.या कार्यक्रमावेळी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवक व पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.