बिजासन घाटात भीषण अपघातात चार तरुण ठार

35

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.30ऑक्टोबर):- बिजासन घाटात भीषण अपघात मारुती कारचा चेंदामेंदा चार तरुण ठार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. कळवण तालुक्याती सुळे येथील.(एमएच ४१, एएस ६९४१) या गाडीचा अपघात झाल्याने सचिन संपत गांगुर्डे(वय १९), राजू सिताराम गांगुर्डे(२६) शिवा रामदास गांगर्डे(२५) व रामदास सोमनाथ दळवी(३५) चौघे रा. सुळे ता (कळवण) दिवाळी निमित्त कपडे खरेदी साठी सेंधावा(मध्य प्रदेश) येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना हा अपघात बुधवारी (ता.२७) रात्री साडेआठ नंतर शिरपूर जवळील बिजासनी घाट ते पळासनेर दरम्यान भिलट देवजवळ(जि.धुळे)येथे. हा अपघात घडला. त्यात मारुती बॕलेनो कार पूर्णतः चेपली गेली. कारमधील तिघे एकाच घरातील गांगुर्डे भांवड होते.

व त्याचे जागीच मृत्यू झाले. तर एकाच उपचारासाठी नेत असताना रामदास दळवी यांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश  कडून धुळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. नंतर या कारमागे येणाऱ्या सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकल्याने अपघाताची भीषणता वाढली. अपघातग्रस्त व काही वाहने अक्षरशः कापून त्यात अडकलेल्यांना बाहेर काढावे लागत होते. सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकार्यांनी मदती साठी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.