छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तलवाडा येथे निषेध

29

🔹कर्नाटक सरकारने आरोपिस कडक शासन करावे – तुळशीराम वाघमारे,रवि मरकड

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.28डिसेंबर):-कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तलवाडा ता.गेवराई या ठिकाणी शिवप्रेमीकडून तसेच संत रविदास प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य या अराजकीय संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व आरोपीस कर्नाटक सरकारने कठोर शासन करावे अशी मागणी संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे व मनसेचे तालुकाउपाध्यक्ष रवी भैया मरकड यांनी केली.

तलवाडा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धअभिषेक करून शाल,पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर सदर घटनेचा निषेध व्यक्त करत सर्व शिवप्रेमी यांच्या भावना लक्षात घेता संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे व मनसे चे तालुका उपाध्यक्ष रवी मरकड यांनी व मिठठू आंधळे यांन आरोपीस कठोर शासन करावे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी दैनिक झुंजार नेताचे पत्रकार सुभाष शिंदे,पार्श्वभूमी चे जेष्ठ पत्रकार तथा समता परिषद तालुकाध्यक्ष बापू आण्णा गाडेकर, पत्रकार अल्ताफ कुरेशी ,विष्णू राठोड,अशोक सुरासे,डॉ.सुरेश गंधले,सचिन डोंगरे,शेख अतिकभाई शिवसेना सर्कल प्रमुख शेख रफिकभाई,पप्पू तेलुरे,रोशन हात्ते,महेश शिंदे,राजाराम खंडागळे,पिनू गोरे,महादेव वाघमारे,बंटी भांबरे,अशोक शिंदे,सचिन नाटकर,संभाजी नाटकर,नारायण हजारे,शेख शेरू,हरिदास पालवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते