बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचे तर्फे ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांचा हृदय सत्कार संपन्न

32

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी)

परळी(दि.15मार्च):-आद्यकवी श्रीमुकुंदराजस्वामी रचित,” सार्थ विवेकसिंधु”ग्रंथ निरूपण आणि संपादन ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी केले असून त्याचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले .

परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य श्री आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून श्री आंधळे महाराज यांचा हृद्य सत्कार दिनांक १३मार्च२०२२ रोजी शाल , श्रीफळ,पुष्पहार देऊन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते श्री बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचे हस्ते धर्माधिकारी यांच्या कार्यालयात करण्यांत आला.

सदरसत्कार समारंभ वेळी श्री रमेशअप्पा चौडें , श्रीसुरेंद्र कावरे,शरद कावरे,वाघमारे सर, सचिन स्वामी तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.