राज ठाकरेंनी …दम असेल तर स्वत; मस्जीद वरील भोंगे काढून दाखवावेत – दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

33

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव प्रतिनिधी)

हदगाव(दि.4एप्रिल):-भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही बोलणे नसून जबाबदारीने बोलणे होय.उलट संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन बाकी सर्व असंविधानिक बोलायचं हे राज ठाकरेचे नित्याचेच झाले आहे. गुढी पाडव्या निमित्त दि.२/०४/२०२२ रोजी शिवाजी पार्क,मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या भाषणात बेरोजगार,हॉस्पिटल,उद्योग,रस्ते,शिक्षण,पाणी,बेरोजगारी,महागाई,पेट्रोल,केंद्रीय यंत्रणेचा गैर वापर,खाजगी करण इ.वर आपले मत व्यक्त करतील असे वाटत होते.

पण ई.डी च्या भीतीने राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे भाजपची सुपारी घेतली याचा पुरावा होय.त्यामुळे भविष्यात मुंबई महानगर पालिकेत भाजप – मनसे युती झाली तर आश्चर्य वाटायला नको.कोणतीही स्पष्ट भूमिका नसलेला,धरसोड वृत्ती असलेला व कोणत्याही विषयाशी एकनिष्ठ नसलेला नेता म्हणजे राज ठाकरे होय.लोकशाहीत सत्तेत असलेल्या सरकार वर टीका करायची असते.केंद्रात भाजप आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्यामुळे त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर समान टीका करणे आवश्यक होते.पण आज राज्य सरकार वर तुटून पडणारे राज ठाकरे यांचा पुर्वीचा लोकसभा प्रचारातला “लाव रे तो व्हिडिओ” आज का डिलीट झाला हे सुज्ञान नागरिकाला आता चांगलं कळायला लागले आहे.कीरीट सोमय्या,गोपीचंद पडळकर,व नारायण राणे पिता-पुत्रा बरोबर ति जबाबदारी आता राज ठाकरे वरही भाजपने दिली याचा पुरावा म्हणजे राज ठाकरे चे आजचे भाषण होय.महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष म्हणजे विझणारी ज्योत असून त्या ज्योतीला तेवत ठेवण्या साठी शांत असलेल्या महाराष्ट्रात राज ठाकरे यांना हिंदू – मुस्लिम दंगे पेटवायचे व त्या दंग्यात मेलेल्या बहुजनांच्या अर्थात हिंदूंच्या पोरांना जाळताना त्या सरणावर आपल्या पक्षाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या हे राज ठाकरे यांना चांगलेच माहित आहे.

कोमात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिवंत ठेवण्यासाठी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा मजिदी वरील भोंग्या समोर दुप्पट भोंग्याचा आवाज करून हनुमान चालीसा सुरु करा म्हणजे बेकार असलेल्या बहुजन पोरांना रोजगार उपलब्ध करून देण्या ऐवजी राज ठाकरे धर्माच्या नावाखाली त्यांची माथी भडकावून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गरीब व बेकार असलेल्या बहुजन समाजाच्या मुलांना का समजत नाही.मस्जीद वरील भोंग्याच्या बाबतीत एक म्हण आठवली “हत्ती चला बाजार कुत्ते भोकते हजार”मस्जिद वरील भोंग्याच्या (लाऊडस्पिकर) बाबतीत अगोदरही अनेक कुत्रे भुकले आणि आताही भुकतात हे मुस्लीम बांधवासाठी नवीन नाही.राहिला प्रश्न मजिदी वरील भोंग्याचा मशिदीवरील भोंगे (लाऊड स्पीकर) मुस्लिम बांधव कधीच काढणार नाहीत. मी राज ठाकरेंना सांगू इच्छितो किती दिवस बहुजनांच्या पोरांचा बळी घेऊन आपली पोळी भाजून घेयायची त्याच्यांवर पोलीस केसेस लागुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करायचे आणि आपण मात्र पोलिस संरक्षण घेऊन ए.सी. मध्ये बसून सर्व टी.व्ही.वर उघड्या डोळ्यांनी बघायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे.

म्हणून भीम टायगर सेनेच्या वतीने राज ठाकरे यांना आव्हान करतो खरंच तुमच्यात दम असेल तर तुम्ही व तुमचा पोरगा अमीत ठाकरे यांनी मस्जिद वरील भोंगा काढून दाखवावा तेव्हा कळेल किती अवघड काम आहे. भाषणा पुरता बाहेर पडणाऱ्या किंग नेहमी हातपाय तोडण्याची भाषा करतो त्यांना विचारायचे जीवनात कधी मच्छर तरी मारले काय? निघाले मज्जिद वरील भोंगा काढायला ? असा सवाल दादासाहेब शेळके यांनी उपस्थित केला