शौर्य,साहित्य आणि चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श संघर्षयोद्धा संभाजीराजे होय

34

इतिहास हा ऐतिहासिक साधने, पुरावे यावरून लिहिला जातो. त्या इतिहासातून शोध, बोध व प्रेरणा घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करत असतो. तथ्य आणि सत्य बाबी या वैचारिक इतिहास लिखानातून, वाचनातून पुढे येत असतात.वाचन हे व्यक्तीला माहिती मिळवून देते. चिकित्सक,वैचारिक वाचनामुळे व्यक्ती समृद्ध आणि आनंदी बनवते.त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढला जातो. म्हणून वेळ काढून वाचूया! तसेच काव्य कादंबरी नाटक चित्रपट यापेक्षा ऐतिहासिक आणि वैचारिक वाचन करावे असे वाटते. कारण व्यवस्था आजही अप्रासंगिक,युगबाहय/कालबाहय महाकाव्य अशा बाबीवर तुम्हांला नाचवित आहे,असे वाटते.

*१.जन्म बालपण:-* आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात ज्याने प्रचंड संघर्ष केला,ज्याला सवाई शिवाजी महाराज म्हणून गौरविण्यात आले त्या छत्रपती संभाजी महाराज यांचा परिचय आपण करून घेऊया.त्यांचा जन्म 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावर महाराणी सईबाईच्या पोटी झाला.त्यांच्या जन्माचे खूप स्वागत झाले.सखुबाई,रानुबाई आणि अंबिका नंतरचे हे चवथे अपत्य होय.पण यातच सईबाईची प्रकृती बिघडली आणि बाळाला आवश्यक आईच दूध येईना, त्यामुळे जिजामाता यांनी कापूरहोळ येथील धाराऊ गाढे यांच्या मर्जीने त्यांची दुधआई म्हणून सोय केली. बाळ शंभू रांगत होते सव्वा दोन वर्ष वय आणि दुसरे संकट आले आई सईबाई यांचा बाळंत रोगाने 5 सप्टेंबर 1659 ला मृत्यू झाला.वडील स्वराज्याच्या मोहिमेत आणि आईचा मृत्यू अशा अवस्थेत आजी जिजामाता यांनी त्यांच्यावर संस्कार केले.त्यांची तल्लख बुद्धी आणि critical thinking and problem solving approch यामुळे युद्धविषयक आणि भाषा शिक्षण यात त्यांनी असामान्य प्रगती केली.बालपणीच्या खेळण्याच्या वयात 8 व्या वर्षी त्यांना मुघल छावणीत 11जून 1665 च्या पुरंदरच्या तहानुसार बापाशिवाय *जामीन ओलीस* म्हणून रहावे लागले. मुघलांचा पंचहजारी मनसबदार म्हणून व्हावं लागलं. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांच्या सोबत रहात असतांना चर्चा संवाद यांत त्यांच्या बुद्धीची चुणूक याने हे दोघेही प्रभावित होतं. त्यावर खूश होऊन दिलेरखानाने त्यांना एक हत्ती भेट दिला.लगेच खोचक प्रश्न केला की,

“*शंभू आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा !इसे आप कैसे लेकर जायेंगे?*
बाळ शंभू बाणेदारपणे उत्तर देते,
खानसहाब ,
*यह हाथी है जो* *चलता है,हिलता है ,ईसे तो हम लेकर जायेंगे,लेकिन*हमारे ज्यो 23 किल्ले* *आपको तह में दिये है* *वह न हिलते है,*न चलते है,* *उसे आप कैसे लेकर जायेंगे?*
खानाची बोलती बंद!
वय 9 वर्ष. 5 मार्च 1666 ला तहाच्या अटीनुसार औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाल शम्भू यांना जावे लागते. त्याठिकाणी अपमानास्पद वागणूक यामुळे शाही दरबारातून हे पिता पुत्र निघून येतात,त्यामुळे बादशहा त्यांना नजरकैदेत टाकतो.यातून शिताफीने शिवराय आणि शंभू निसटून येतात.मात्र ही बातमी माहीत होते आणि दोघांनी सोबत पसार होणे यात अडचणी येतात म्हणून बाल शंभूला मथुरेत ठेवतात.महाराज संन्याशी वेशात 12 सप्टेंबर 1666 ला सुखरूप रायगडावर पोहचतात. त्यावेळी शम्भू कुठे आहे? तर उत्तर शंभूचे प्रवासात निधन झाले आहे,त्यांचे मृत्यूनंतरचे विधी ही ते रायगडावर उरकून घेतात.त्यामुळे बादशाहाची शोध मोहीम थांबते!पुढे दोन महिने आठ दिवसांनी 20 नोव्हेंबर 1666 ला शंभूराजे रायगडावर सुखरूप पोहचतात.

२.सांस्कृतिक दहशत संपवून साहित्यलेखन*:- शंभूराजे राज्यकारभारात लक्ष घालत. विविध भाषा, राज्यकारभार, आणि लष्करी शिक्षण यांत ते पारंगत झाले होते.वय 13 वर्ष असतांना 26 जानेवारी 1671 ला त्यांना स्वतंत्र कारभार पाहण्यासाठी जबाबदारी देण्यात आली.याचवर्षी रायप्पा महार याचे शौर्य पाहून शिवरायांच्या भरदारबारात त्याचा सत्कार केला. पुढे त्याला आपल्या खास सहकारी म्हणून जबाबदारी दिली. पुढे दहा हजार सैन्याचे नेतृत्व देण्यात आले.वय 14 वर्ष असतांना बुधभूषण हा संस्कृत मधील अतिशय मौलिक ग्रंथ लिहला.जो क्रांतिकारक आणि मार्गदर्शक ठरला. ज्यांनी वेळ काढून तो लिहून सांस्कृतिक साहित्य निर्मिती केली.आम्ही वारस म्हणून किमान तो वाचवा तरी! ज्याचा मराठीत सार ,

” *जे दैववादी ते नामर्द*
*जे प्रयत्नवादी तेच मर्द”*.
(58वा श्लोक बुधभूषण)

आम्ही मावळे म्हणून घेत असू तर वर्तन तपासावे लागेल!
पुढे त्यांनी हिंदी भाषेत नायिकाभेद,नखशिख,आणि सातसतक हे ग्रंथलेखन केले.ज्यात संत कबीर,संत रविदास,संत नामदेव या संतांच्या विचारांचा प्रभाव आहे.त्यांचा गौरव करतांना काशीचे पंडित गागाभट यांनी त्यांचा “समयनय” हा ग्रंथ शंभूराजे यांना अर्पण केला आहे.वयाच्या 16 व्या वर्षी 6 जुन 1674 ला शिवराज्याभिषेक वेळी युवराज म्हणून हक्क,अधिकार व जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी अनेक दूत यांच्या सोबत त्या भाषेत त्यांनी संवाद साधला. यात उदाहरण म्हणून ब्रिटिश प्रतिनिधी हेंरी ऑक्सिडेन सांगता येईल. शंभूराजे बहुभाषा पारंगत होते.लागलीच 15 व्या वर्षी त्यांनी आदिलशाही मुलखावर स्वारी करून गोवळकोंडा,भागानगरी (हैद्राबाद) स्वराज्यात सामील केले.तसेच शिवरायांच्या नितीनुसार 13 डिसेंबर 1678 ला शंभूराजे यांना दिलेरखान यास मिळतात.त्यावेळी ते विजापूर ताब्यात घेण्यासाठी कूच करतात. मध्येच दिलेरखान भूपाळगडावर हल्ला करून स्त्रिया आणि रयतेला त्रास देतात त्यामुळे त्यांचे दिलेरखान सोबत खटके उडतात. त्यामुळे दिलेरखान शंभूराजे यांना संपविण्याचा बेत करतो. ही बाब माहीत होताच शंभूराजे शिताफीने निसटून 21 डिसेंबर 1679 ला स्वराज्यात पन्हाळगडावर पोहचतात.12 जानेवारी 1680 ला त्याच ठिकाणी राजसदरेत शिवराय आणि शंभूराजेची तीन वर्षानंतर भेट होते.

*3*अष्टप्रधानातील पंताची कुटील कटरचना*:- स्वराज्याला शिस्त लावण्यासाठी शम्भूराजे प्रत्येक काम पूर्णपणे झोकून देऊन करत.ते परखड स्पष्टवक्ते होते. त्यांना कारभारात हयगय, प्रजेचे दुःख,हाल ,त्यांच्यावर अन्याय सहनच होत नसे. “रयतेचे राज्य” यासाठी ते प्रसंगी कुणाचीही गय करत नसे. अण्णाजीपंत दत्तो ,मोरोपंत पिंगळे,राहुजीपंत सोमनाथ, निराजीपंत रावजी हे शंभूराजे चारित्र्यहनन करणे,त्यांना जीवित मारणे, तसेच शिवराय,महाराणी सोयराबाई यांच्या कडे शंभूराजे बाबत सतत तक्रारी करणे, त्यांच्यात दुही निर्माण करणे असे कुटील डाव खेळत राहिले. ज्यात शिवरायांच्या निधनानंतर 3 एप्रिल 1680 ही बातमी शंभूराजे यांना माहिती होवू नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करून घेतात. शंभूराजे यांच्या गैरहजेरीत अंत्यविधी उरकुन घेतात.त्यांना निरोप ही देत नाहीत. महाराणी सोयराबाई यांना आमिष दाखवून ‘या’ पंतांचा पूर्ण ताबा राहील या हिशोबाने युवराज असणारे व हक्कदार असणारे शंभुराजे यांना डावलून एप्रिल 1680 ला 10 वर्षाच्या राजाराम यांस राजगादीवर बसवून शंभूराजे यांना अटकेचे आदेश काढतात.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मात्र ही बाब पटत नाही,ते या पंतांनाच अटक करून शंभूराजे पुढे हजर करतात.पुढे 16 जानेवारी 1681 ला शंभूराजे यांचा राज्याभिषेक होतो.कट करणाऱ्या पंतांना शंभूराजे माफी देतात. परंतु सवय जात नाही, ते शंभूराजे यांना अन्नातून विषप्रयोग कट साधतात,परंतु तो एका सैनिकामुळे उघड होतो.पुढे हे पंत तर औरंगजेब पुत्र अकबर यास खलिता पाठवून त्यास संभाजीस ठार करावे तुला स्वराज्यातील काही हिस्सा देवू! परंतु हा खलिता तो शंभू राजाकडे पाठवितो.त्यावेळी मात्र शंभूराजे हा स्वराज्यद्रोह न्यायाने अण्णाजीपंत,सोमाजीपंत, आवजीपंत यांना हत्तीच्या पायाखाली देतात.

*४.सतत रणझुंजार योद्धा*:-वयाच्या 23 व्या वर्षी राजगादीवर बसल्यानंतर शंभूराजे यांना बादशहा औरंगजेब याच्या कुटील डावामुळे मोगल,इंग्रज ,पोर्तुगीज, फ्रेंच,डच या पाच सत्ता सोबत युद्ध संघर्ष करावा लागला.140 अजिंक्य लढाया लढलेला हा योद्धा.काबुल ते बंगाल आणि काश्मीर ते भीमा नदी अशी सत्ता ज्याची तो मोगल बादशहा औरंगजेब म्हणजे प्रचंड फौज, शस्त्रे, दारूगोळा, सरदार,रसद, संपत्ती,आणि 500 वर्षाची सत्ता परंपरा असणारा. ज्याने 6 महिन्यात 1686 ला आदिलशाही संपविली तर 9 महिन्यात 1687 ला कुतुबशाही संपविली.पण ज्याला स्वराज्याशी 19वर्ष संघर्ष करावा लागला अन स्वतः ही इथेच संपला.संभाजीराजे यांनी त्याच्या सोबत सतत 9 वर्ष संघर्ष केला.एक रामसेज किल्ला घेण्यासाठी त्याला 5 वर्ष लागले.ज्याने शंभूराजे पराक्रमाचा धसका घेऊन डोक्यावरची पगडी उतरविली! शिवराज्य संपवित नाही तो पर्यंत पगडी घालणार नाही!

शंभूराजे डीचोळी,कुडाळ येथे दारूगोळा कारखाने उभारतात,त्यासाठी पोर्तुगीज यांच्याकडुन स्फोटाची दारू मागवतात. भारतातील पहिला तोफखाना शंभूराजांनी बनविला.तसेच मुंबई बंदर व इतर व्यवहार संदर्भात इंग्रज गव्हर्नर केजविन सोबत वाटाघाटी करतात. संभाजी राजे रायगड ते बुऱ्हाणपूर धरणगाव,जालना, बिदर,म्हैसूर येथे छापे मा.
*६. इतिहासातून आपण धडा घेऊया*-
संभाजीराजे यांची राजमुद्रा
*श्री शम्भो:शिव जातस्य*,
*मुद्रा धौरिव राजते*।
*यदंकसेविनो लेखा*,
*वर्तते कस्य नोपरि*।।
याचा अर्थ शिवाजीराजे यांचे पुत्र संभाजीराजे यांची ही मुद्रा आकाशाप्रमाणे शोभा देत आहे.तिचे अंक स्वीकार कारणारांचा पगडा कोणावर पडणार नाही? .
संत तुकाराम महाराज यांचा मुलगा महादजी यास देहूत आश्रय देऊन वार्षिक मोईन अनुदान सुरू करतात.संत तुकाराम महाराज पालखी देहू ते पंढरपूर सुरू करतात. चिंचवडेच्या मोरेश्वर गोसावी यांना संरक्षण तर केळशीच्या अवलिया फकीर बाबा यांना वर्षासन कायम केले.तसेच दुष्काळी परिस्थिती मध्ये सारा माफी केली.तसेच पडीक जमीन वहितीसाठी सहाय्य केले.शेती सिंचन सोयीसाठी,विहिरीसाठी मदत केली.पशुपालन प्रोत्साहन दिले.त्यासाठी चराईक्षेत्र साठी सनदा दिल्या. फ्रेंच प्रवासी अबे करे म्हणतात, संभाजी महाराज हे “शिवरायापेक्षा काकणभर अधिक सरस होते.तसेच सैन्याला त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास अधिक आनंद असे.”
काही कलमकसाई यांनी काव्य, कादंबरी,नाटक,चित्रपट यातून शंभूराजे यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले.यात वसंत कानेटकर यांनी गोदावरी हे ,कवी बी याने थोराताची कमळा,आत्माराम पाठारे याने तुळसा नावाचे काल्पनिक पात्र नाटकात रचली. ही सर्व पात्र अनैतिहासिक आहेत.राम गणेश गडकरी, बेडेकर,पुरंदरे,भावे,सावरकर हे त्यांना व्यसनी दाखवितात,जे स्पष्टपणे खोटे आहे.चारित्र्यसंपन्न राजा म्हणून गौरव करावा असे शंभूराजे.आपल्या एकमेव पत्नीचा येसूबाई ,
*”श्री सखी राज्ञी जयति*”
असा गौरव करतात. तर आपल्या वडिलांचा शिवराय आणि आपल्या माता यांचा शब्दप्रमाण मानून त्याप्रमाणे वागतात.आपण शंभूराजे यांचे चरित्र समजून घेऊन त्यांच्या कृतीविचारांचा वारसा अंगीकृत करून विचारांचे प्रचारक बनून पुढे जाऊया.

✒️लेखक:-मा.रामेश्वर तिरमुखे,कार्याध्यक्ष,सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ,महाराष्ट्र.मोबा.09420705653 ramtrimukhe@gmail.com