कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार आणि परिणाम!

41

जग झपाट्याने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने माणसाची प्रगती होत आहे. पण नीतिमत्ता म्हणजे काय? हे आजच्या तरुण तरुणीनी स्मार्टफोन किंवा गुगल वर सर्च केल्यास त्यांना ती मिळणार नाही. सुशिक्षित तरुण तरुणीची इच्छा मना सारखा जोडीदार नवरा मिळावा हीच अपेक्षा असते. पण त्यात इतर पात्र नसावे. ज्या आई वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे केले ते प्रथम दोघांच्या जीवनातून हद्दपार झाले पाहिजे.ही आईबापाची लाडकी लेक म्हणते!कारण कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार आणि परिणाम झाले आहेत.

मानवतावादी धर्म संस्कार आता कुठे राहिले नाहीत. घोर कलियुग आला, मुलगा बापाला संपत्तीत वाटा मागतो. नाही दिला तर कोर्टात खेचतो. लोकशाहीर दादा कोंडके यांची आठवण येते. त्यांचे प्रत्येक चित्रपट आणि त्यातील गाणे समाजाचे प्रबोधन करणारे. जनजागृती करून मोठा संदेश देणारे होते. गेल्या वर्षात सुशिक्षित व सुरक्षित नोकरी करणाऱ्या मुलाने प्लॉट साठी आईवडीलाचा नारळ पाण्यात विष घालून मारल्याची घटना घडली होती. मातृसत्ताक व्यवस्था संपली आणि पुरुषसत्ताक व्यवस्था आली. त्यामुळे एकत्र कुटुंब व्यवस्था संपली, आणि विभक्त कुटुंब व्यवस्था आली.पूर्वी पाचभाऊ लग्न झाल्या वर भी नातवाचे लग्न होई पर्यंत एकत्र राहत होती. पण कधीच भावा भावांचे किंवा जाऊ जाऊचे, देराणी,जेठाणीचे कधी भांडण होत नव्हती. बोलचाल झाली तरी दोन तासानी सर्व विसरून सर्व कुटुंबातील लोक एकत्र येत असत, अबोला कधी कोणीच धरत नसत. पुरुषांचा महिलांवर आणि महिलांचा पुरुषावर शंभर टक्के विश्वास होता. आर्थिक व्यवहारात महिला कधीच बोलत नसत. त्यामुळे महिला मध्ये आपल्या कुटुंबातील सर्व बद्दल सारखे प्रेम, आदर आणि जिव्हाळा होता.आताच्या मुली सुशिक्षित झाल्या पण कुटुंबातील नवरा सोडून कोणा बद्दल प्रेम, आदर जिव्हाळा राहिला नाही, कारण ती आईबापाची लाडकी लेक असते. कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार झाले हे यातूनच स्पष्टपणे दिसते.

आजच्या दूरदर्शन वाहिन्या वरील उच्चभु वर्गातील घरातील घडणाऱ्या घटना म्हणजे आजच्या सिरीयल त्याला जबाबदार आहेत. त्यांचा गंभीर परिणाम मध्यमवर्गीय मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात होत आहे. असे म्हटल्यास चुक ठरणार नाही. मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य लोक ग्रामीण भाग सोडुन शहरी भागात आले चांगली नोकरी मिळाली त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणूनच ते मध्यमवर्गीय झाले.

शिक्षण आणि विज्ञान यांच्यामुळे सर्वाचाच विकास होत असतांना काही लोक अजूनही देवा देविकाच्या उपास,तापास,नवस याला महत्व देतात.एकच वेळी विज्ञानाचा भरपूर वापर करून फायदा घायचा आणि अज्ञान अंधश्रद्धा याला चिटकून राहायचे त्यामुळे ते खुप पुढे गेले असे म्हणता येत नाही आणि खुप मागे राहिले असे ही म्हणता येत नाही.गांव असो अथवा शहर बहुसंख्य कुटुंबात मुलामुलीचा संसार सुखात नाही.मुला मुलीच्या लग्न झाल्यावर अनेक तक्रारी वाढत चालल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत नष्ट होत चालली आहे. मुलीला नवरा हवा पण सासु सासरे नको !. हे एकमेव कारण अनेक कुटुंबात ठरत आहे.मुलगी वयात आली तर मुलीचे योग्य त्यावेळात लग्न न होणे ही गंभीर समस्या निर्माण होते.मुलींच्या योग्य त्या वयात लग्न न करण्याची कारण शोधली तर आई वडिलांचा एकत्र कुटुंब पद्धतीला असलेला विरोध.आईबापाची लाडकी लेक मग तेच डोक्यात घेऊन बसते.

आम्ही कसे सर्व पासुन वेगळे राहतो असेच मुलीने राहिले पाहिजे त्यातूनच मुलांना विचारले जाणारे प्रश्न मुलीच्या डोक्यात बसतात.यातच मग मुलीच्या भावना व तारुण्य जळत राहते. मुलाची योग्य तपासणी करून चौकशी करा. मुलाचे शिक्षण किती?.नोकरी कोणती करतो, कुठे कामावर आहे?.किती रुपये पगार आहे?.रहायला स्वतःचा प्लॉट आहे का?.कार आहे का?बॅक बॅलन्स किती आहे?.मुलगा एकुलता एक आहे का?.ही माहिती मिळायलाच हवी. पण सरकारी नोकरी पाहिजेच?. मग बीजनेस वाले काय करणार?. कंपनीच्या बॉसची मुलगी नाही देणार?. कारण त्याला नोकरी नसते. पण त्यांचं कंपनीत नोकरी करणाऱ्या सोबत मुलगीच लग्न लावून देनार!. कारण त्याला नोकरी असते.

आई वडिलांच्या या अपेक्षा पूर्ण होत नाही.त्यामुळे मुलीचे लग्न जुळत नाही,दरवर्षी त्या मुलीच वय वाढत जाते. शरीरात मोठा किंवा वेगळा बदल होतो.तुमच्या अपेक्षा पूर्ण होईनात म्हणून मुलींच बावीसव्या वर्षी सुरू केलेलं वर संशोधन आठ दहा वर्षे चालते.अति अपेक्षा ठेवून मुलींच्या आयुष्याचे वाटोळे अनेक पालका कडून होत आहे. आई वडिलांवर विश्वास ठेवला तर लग्न होऊ शकतात. मुलाला सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते. परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करू शकतात. त्यासाठी सरकारी नोकरी असलीच पाहिजे असे नाही.तर एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करू शकतात. मुलांचे आई-वडिलही त्यांच्या पाठीशी असतातच. मुला-मुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते, याची जाणीव मुलींच्या आई-वडिलांनाही असने आवश्यक आहे. मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई व मुलीच्या पाठीशी राहिले पाहिजे. म्हणुन मुलामुलींची लग्ने योग्य वयातच झाली पाहिजेत.हा भावनांचा,तारुण्याचा विचार प्रत्येक आई वडिलांनी केला पाहिजे. आयुष्यभर पैसा येईल, पण एकदा गेलेले वय व तारुण्य पुन्हा येणार नाही.

मी बावीस वधु वर सुचक मंडळ ग्रुपवर आहे. त्याचे संचालक असणाऱ्या मित्रांनी सांगितलेल्या अनुभवाच्या हया कथा आहेत. एक सेवानिवृत्त झालेल्या मुलीचा बाप बायोडाटा दाखवीत होता त्याच्या मुलीच वय ३४ होते. निवृत्ती आगोदर लग्न का नाही झाले?. आता तुम्ही सांगा का थांबलाय होता हा बाप?. कसला वर पाहत होता हा बाप.आपल्या सारखी नोकरीवालाच मुलगा पाहिजे,जर तुम्ही अभिषेक बच्चन सारखा वर शोधत असाल तर तुमची मुलगी ऐश्वर्य रॉय हवीच नां?.कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार आणि परिणाम होतात त्याचा सबळ पुरावा सिनेमा व टीव्ही चॅनल वरील सरीयल यांच्या खूपच कुप्रबोधनामुळे मुलीचे योग्य वेळेत लग्न होत नाही. आणि झालेच तर तिच्या शारीरिक,मानसिक स्वभावात फरक पडतो. ती चिडखोर व बंडखोर बनते मुलगी लग्न झाल्यावर पूर्ण स्त्री बनते.मग अश्या स्रिया एकत्र कुटुंबातील सर्वाना शत्रु समजतात, छोट्या छोट्या कारण वरून वाद विविध,अबोला,भांडण होतात.त्यामुळे एकत्र कुटुंब विभक्त होते. रक्ताची नाते असले लहानाचे मोठे एकत्र झालेले भाऊ एकमेकांना शत्रु समजतात.एका स्त्री मुळेच रामायण आणि महाभारत घडले हा ऐतिहासिक इतिहास आहे.

कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार आणि परिणाम म्हणुन होतात.अविचारी,स्वार्थी स्त्रियांना आळ घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर लग्न जुळवतांना ज्या प्रमाणे सर्व नातलगांना एकत्र बसून दोन कुटुंबाचे मन जुळवून सर्वांच्या साक्षीने लग्न लावले जाते.त्याच पद्धतीने नवरा बायकोत किंवा कुटुंबात वाद विवाद झाला असेल तर तेच लग्न जुळवतांना असलेल्या नातलगांनी समोरा समोर बसून चर्चा करून वाद मिटविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. असे न झाल्यास काय होते. कोर्ट कचेरीत हे प्रकरणे जातात. त्यातून काहीच निष्पन होत नाही.समाजात कोणाचीच बदनामी होत नाही.होतो तो फक्त मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास म्हणून सर्वानीच यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. टीव्ही सिरीयल मध्ये जे दाखविले जाते ते शंभर टक्के सत्य नसते.तर एक काल्पनिक पटकथा असते.लोकप्रिय होण्यासाठी अशा मसालेदार पटकथा त्यांना लिहाव्या लागतात.

आई वडिलांचा त्याग आणि मुलांचे लग्न हे प्रत्येक घरात होत असते.त्या घरात आईबापाची लाडकी लेक सून म्हणून आली तर तिला आईबापाच्या घरी जशी वागत असे तसे वागता येणार नाही. सर्वच वागणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.घरातील सर्व प्रकारची कामे करून वडील धाऱ्यांचा मान सन्मान ठेवून बोलणे आणि वागणे ही आईबापाच्या लाडक्या लेकीला सहन होत नाही. सहा महिने वर्ष सहन कर नंतर वेगळे निघण्याची अट घालू अशी आईबापाची शिकवण असते.त्यामुळेच सहा महिने वर्षांनी आईबापाची लाडकी लेक नवऱ्याला हे सांगते.प्रथम ते नवरा नांवाचा मुलगा ते नाकारतो. शांततेत सर्व एकत्र राहणाऱ्या कुटुंबात हा सुरुंग लागतो. मग सुरू होते आईबापाच्या लाडक्या लेकीचे वागणूक नवऱ्याला प्रथम उलट बोलणे,सासूबाई सासऱ्याचे न ऐकणे काम न करणे, यांची तक्रार लाडक्या लेकीच्या आईबापाला सांगितले तर कोणतीही चर्चा न होता बाप मुलीला घरी घेऊन जातो. दोन कुटुंब ज्या मुलीमुळे एकत्र आले असते तेच कुटुंब त्याच मुली मुळे विभक्त होते. यावर उपाय म्हणजे एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढणे महत्वाचे असते. पण लाडकी लेक व तिचा बाप चर्चा करण्यासाठी तयार होत नाही. मग ज्यांनी ज्या नातलगांनी हा संबंध जुळविला त्यांची मध्यस्थी असली पाहिजे लाडक्या लेकीचा बाप त्यांच्याशी चर्चा करण्यास स्पष्ट नकार देतो. लग्न जुळविणाऱ्या मध्यस्थ नातलग, हितचिंतक यांच्या वर विश्वास नसेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा दाखल केला पाहिजे की नाही. लेकीच्या बापाने नवरा,सासू,सासरे,नणंद दीर सासरच्या कुटुंबावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर गुन्हा दाखल केला पाहिजे की नाही?. पण पोलीस व कोर्टवर ही या बापाचा विश्वास ठेवत नाही. गेली पांच वर्ष लाडक्या लेकीचे आईबाप लेकीला घरी ठेऊन घेतल्यामुळे.मुलांच्या आईवडिलांनी कोर्टात फरकती घेण्याचे केस केल्यावर.अंतिम टप्पात केस आल्यावर हिंसाचारची,हुंडा बळीची केस दाखल करतो.स्वताला शाहणा समजणारा बाप पोलीस आणि कोर्टाला मूर्ख समजतो.

ज्या वेळी संबंधित नातलग, समाजातील समाज बांधव, समाजसेवक यांच्या मार्फत वाद विवाद मिटवून टाकण्याचे सांगत असतांना ऐकून घेत नाही. तडजोडीचे अनेक मार्ग असतांना कोणत्या ही मार्गाचा अवलंब न करता शांत बसणाऱ्या लाडक्या लेकीच्या आईबापाला कोण काय समजून सांगणार?.ही घटना सत्य आहे.मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही.ज्या आई वडिलांनी ज्या अपेक्षेने मुलांचे लग्न करून दिले असते.त्याच आई वडिलांना म्हणजेच सासू सासऱ्यांना बाहेरून आलेली मुलगी अशी वागणूक देत असेल तर त्या जन्मदात्या आई वडिलांनी काय केले पाहिजे?. ही आजच्या सर्व जातीच्या समाजातील कुटुंबातील गंभीर समस्या झाली आहे.कौटुंबिक न्यायालयात हजोरो केसेस चालू आहेत.वर्षांनी वर्ष तारिख पे तारीख केस चालतात. त्यात मुलामुलीचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान होते. जे कधी भरून निघत नाही.ही समस्या एका कुटुंबाची नाही तर सर्व समाजाची आहे.धर्माची आहे.राज्याची आणि देशाची आहे.म्हणूनच कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार आणि परिणाम याचा गांभियाने विचार झाला पाहिजे.

पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरेच न्याय देण्याचे प्रामाणिक काम करते काय?. पैसा असेल तर सर्व मिळेल.पैसा नसेल तर काय भोगावे लागते यांची माहिती घेण्यासाठी चारपाच दिवस कोर्टाच्या आवारात थांबा व पहा,स्री पुरुष समानता च्या गप्पा मारणाऱ्या या राज्यात, देशात महिलांच्या बाजूने भरपूर कायदे आहेत.पण ते महिलांना न्याय देण्यास असमर्थ आहेत. बेचारे पुरुष महिलांच्या मानसिक त्रासामुळे व्यसनाधीन होत आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. मग ती महिला कोणी असू शकते.बायको,आई,बहिण,वाहिनी,सासु नणंद,देवरांनी,जेठानी हे सर्व पात्र आपण नियमितपणे वाहिन्यावर पाहत आहोत.कळी खुलता खुलेना.तू तिथे मी,तुज्यात जीव रंगला, काहे दिया परदेश,अधुरी ही कहाणी,सास भी बहु थी,सिरीयल मागे पडली असली तरी तिची जागा अनेक सिरीयल वेगवेगळ्या नावाने घेत आहेत.

रंग माझा वेगळा,आई कुठे काय करते.मोलकरीण,मोठी तिची सावली,मागासवर्गीय मध्यमवर्गीय महिला टिव्ही सिरीयल पाहण्यात गुंतले आहेत.आज घडीला सर्व टिव्हीच्या चँनलवर ज्या मालिका चालु आहेत त्यामध्ये एकीचा नवरा दुसरयाच्या बायको बरोबर फिरत असतो (माझ्या नवरयाची बायको ) लग्न झालेल्या मुलाची आई दुसरयाबरोबर लग्न करते (अग्गबाई सासुबाई) प्रेम करणे आणि तीला सोडुन देणे किंवा त्याला सोडुन देणे ( तुझ माझ ब्रेकअप) इतर सिरीयल मध्ये प्रेम,घटस्फोट,अनैतिक सबंध,देव आणि अंधश्रध्दा पसरवणारे असेच दाखवले जाते आणि हे दररोज संध्याकाळी सहा सात ला सुरु झाले की रात्री अकरा बारा वाजे पर्यत हे चालु असते, लहान मुलासमोर आणि तरुण मुलामुली सोबत बसून काय पाहिले पाहिजे,याचे भान ही कोणालाच नसते. आणि याचाच परिणाम कुटुंबव्यवस्थेवर होत आहे.असे म्हटल्यास लिहल्यास चूक ठरणार नाही.

पुरुष जीवन भर संसार करण्यासाठी त्याग व संघर्ष करीत असतो. समाज काय म्हणेल या भीती पोटी सतत समझोता करीत राहतो. दुःख विसरण्यासाठी तो दररोज नशा करतो म्हणजे दारू पितो. सर्वच दुःखावर दारू हेच प्रभावी औषध आहे असे लोकांना वाटते. पण आज पर्यंत कोणाचे दुःख नष्ट झाल्याचे उदाहरण नाही,पण त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊन कायमची बिमारी मागे लागल्याचे एक नाही हजारो उदाहरणे आहेत. म्हणुन प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, तसाच प्रत्येक व्यसनाधीन,अपयशी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो.म्हणुन प्रत्येक पुरुष हा स्त्रीयांचा बाप,पती,नवरा,मुलगा,भाऊ,जावई,सासरा,दीर,मामा,काका कोणी ना कोणी असतोच. म्हणुन एकत्र कुटुंबातील पुरुषांना नेहमी स्त्रीयांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. तसाच पुरुषांनी स्त्रीयांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे. हा संस्कार घरा घरातुन मुलामुलींवर झाला पाहिजे,टीव्ही सिरीयल मध्ये जी महिलांची पात्र दाखविली जातात.ती खलनायिका असते.ती तशी कुटुंबात वागू शकत नाही.म्हणूनच आजकालच्या तरुण मुलीवर कुटुंबव्यवस्थेवर टीव्ही सिरीयलचे संस्कार आणि परिणाम होत आहेत.असे मला वाटते.1

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९