विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली विवाहित युवती बुडाली

103

🔸गावातील लोक शोध घेतं आहेत माञ विहीर खोल असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

धारूर(दि.8ऑगस्ट):- तालुक्यातील सुकळी या गावातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली विवाहित युवती राणी गणेश राऊत (वय 21 वर्ष) पाय घासरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. विहीर खोल असल्याने प्रेत बाहेर काढण्यासाठी गावातील नागरिकांनी खुप प्रयत्न केले माञ अपयश हाती आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

त्या वेळी सुनिल अदोडे अग्निशमन पथक प्रमुख परळी वै . व त्यांच्या टीम ने अथक परिश्रम घेत विहिरीत पडलेली युवातीला बाहेर काढण्यात आले.सिरसाळा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.शेळके व बीट अमलदार मिसाळ घटना स्थळी उपस्थित होते.