कारंजा येथे तिरंगा बाईक रॅली संपन्न

34

🔸जयकुमार बेलखडे मित्रपरिवाराचे आयोजन

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.17ऑगस्ट):-आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष 15 ऑगस्ट ला पूर्ण झाले आहेत म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले होते.या अभियानाअंतर्गत स्वतंत्र अमृत महोत्सवानिमित्त वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरात तिरंगा बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.या तिरंगा बाईक रॅली चे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते जयकुमार बेलखडे यांच्या तर्फे करण्यात आले होते. कारंजा येथील गोळीबार चौक पासून ते संपूर्ण कारंजा शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.

भव्य दिव्य तिरंगा हातात घेत भारत माता की जय नारा देत देशभक्तीपर गीत लावून कारंजा तालुक्यातील युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाईक रॅली काढली.या रॅली ला प्रमुख पाहुणे कारंजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या हस्ते फीत कापून रॅली ची सुरुवात करण्यात आली होती.यावेळी तिरंगा बाईक रॅली कार्यक्रमाला जयकुमार बेलखडे ,हर्षा बेलखडे ,रानासिंग बावरी,संजूसिंग बावरी ,अमर लिलहारे ,मुख्तार शेख, नौशाद सौदागर ,मिथुन बावरी, रोशन चौधरी व कारंजा तालुक्यातील अनेक युवक उपस्थित होते.