चिमुर नगर परिषदेचे अजुनही नियोजन शुन्य

34

🔹असा आरोप काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमुर(दि.20ऑगस्ट):- नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्यधिकारी मॅडम कार्यरत झाले परंतु कामाकडे लक्ष नाही असा दिसुन येत आहे. आणि असुन त्यांना जवळपास एक महिना होत आहे. परंतु अजुनही नियोजन बरोबर दिसुन येत नाही आहे.आणि शासनाचा नियमाने ५ दिवसाचा आठवडा आहे . त्यात आठवळ्यातून १ कीवा २ दिवस त्यांचेकडे सिंदेवाही नगर पंचायतच्या प्राभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती आहे. आणि चिमुर नगर परिषदेला फक्त ३ दिवस बसतात यात कार्यालयाचे थकित कामे होतात आणि शहरात काहीच लक्ष देत नाही. नगर परिषद अंतर्गत भरपुर समस्या निर्माण झाल्या आहेत या प्रकारे….

*१) शहरात व ग्रामीण भागात स्वच्छता बरोबर होत नाही आहे.* *फक्त शहरात मेन रोड साफ करता*
*२) शहरात व ग्रामीण भागात कचरा गाडी प्रत्येक प्राभागत बरोबर जात नाही आहे.*
*३)शहरात व ग्रामीण भागात पाणी पुरवठा बरोबर होत नाही आहे.*
*४) अभ्यंकर मैदान येथील पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे बंद केली आहे. परंतु पर्याय वेवस्था अजुनही केलेली नाही आहे.*
*५) शहरात व ग्रामीण भागात काही ठिकाणी दिवाब्बती बंद आहे. याकडे लक्ष देत नाही आहे.*
*६) शहरात व ग्रामीण भागात पावसामुळे खड्डे पडले आहे खड्यात मुरूम किवा चुरी टाकण्यात आली नाही आहे.*
*७) पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल संदर्भात लाभर्त्याला पत्र मिळाले परंतु अजूनही पाठपुरावा नाही.

असे अनेक प्रश्न आहे. तरी नगर परिषद याकडे लक्ष का देत नाही आहे. आणि म्हणून शासनाने मुख्यधिकारी यांची ५ ही दिवस नियुक्ती चिमुर नगर परिषदेला करावी असी मागणी काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.