मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली?

26

मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी स्थापन झालेली शिवसेना आणि तिचे संस्थापक शिवसेना प्रमुख यांनी मुंबई ठाण्यातील मराठी तरुणांना प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात मूलभूत समस्यावर हल्ला बोल करून स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदारांना जेरीस आणले होते, कायदेशीर कायदेकानुन सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तोडफोड करून दंगली घडवून दहशत निर्माण केली होती. स्थानिक मराठी लोकाधिकार समितीच्या नांवाने सर्व ठिकाणी परप्रांतीय कामगारंची होणारी भारती याविरोधात प्रस्थापित कामगार संघटना,युनियनच्या विरोधात संघर्ष करून मराठी तरुणांना नोकरीत घेण्यास भाग पाडले होते. कंपनीचा मालक असो की व्यापारी, बिल्डर,बँक मॅनेजर यांच्या घरात कार्यालयात घुसून तोडफोड करून तोंडाला काळे फासून दहशत निर्माण केली होती. त्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी नोंदी झाल्या पण ठोस कारवाई झाल्याची नोंद नाही.त्यावर उपाय योजना करण्यास सत्ताधारी राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी शिवसेना मुंबई ठाणे महानगरपालिका मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी झाली. त्यांचे शाखा प्रमुख नगरसेवक झाले,नगरसेवकांचे आमदार झाले.त्यांनी दलित मुस्लिम समाजा विरोधात सतत गळल ओकली त्यामुळे मराठी हिंदू ह्र्दय सम्राटावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.त्यावेळी शिवसेना प्रमुखांची जाहीर धमकी होती माझ्या केसाला हात लावला तर उभा महाराष्ट्र पेटेल!.किंवा पेटून टाकील आणि त्यांचे परिणाम वाईट होती.

या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था कायमस्वरूपी धोक्यात आली होती. पोलीस अधिकारी प्रत्येक वेळी कारवाई करण्यात मोठा धोका आहे असे रिपोर्ट सत्ताधारी पक्षाच्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना सादर करीत होते.यामुळेच मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात होती ती आता संपली. ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.

सहा डिसेंबर 1956 पासून दादरच्या चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसर दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाला वंदन करण्यासाठी येतात. त्यांचे रिकार्ड मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपून जाईल असे अनेक मराठा समाजाचे स्वताला सुवर्ण समजणारे कट्टरपंथीय शिवसैनिक म्हणत होते. कारण स्वताला सुवर्ण समजणाऱ्या मराठा समाजाच्या रक्तात दलित मुस्लीम समाजा विरोधात जहर पेरण्याचे काम मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळ ठाकरे यांनी केले होते. जे बाळ कडू पाजले होते ते आज ही कायम आहे. त्याला निमित्य होते २७ जुलै १९७८ ला मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नांव देण्याचा विधानसभा विधानपरिषद मध्ये एकमताने मंजूर झालेला ठराव. त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात “जय शिवाजी जय भवानी” घोषणा घेऊन पोचली. त्यात मराठा ओबीसी समाजाचे गांवगुंड असलेले पोर शिवसैनिक झाले. त्याची सुरवात ठाण्यातून झाली. सध्या गाजत असलेल्या धर्मवीर सिनेमात पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या गुंडांना सोडविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब येतात आणि सांगतात हे तुमच्या रिकार्ड मध्ये गुंड असतील पण ते माझे कट्टर शिवसैनिक कार्यकर्ते आहेत.

तोच रिक्षावाला वाहन चालक,नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने शहरातून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शिवसैनिकांना भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पाप मुक्त करण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम करीत आहे.

प्रिय मराठी वाचक बांधवांनो, अनेक कामगार,कर्मचारी अधिकारी वाट्साप ग्रुपवर कृपया राजकीय पोस्ट टाकणे बंद करा असे म्हणतात. ते सर्वच मराठी आहेत,त्यात मराठा ओबीसी जास्त असतांना ही ते शिवसेनेच्या राजकीय कुरघोडीवर घरफोडीवर चर्चा करण्यास मनाई करतात. त्यामुळे आपल्यात कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गात मतभेद होऊन संबंध गढूळ होणार अशी शंका घेतात. त्यासाठी राजकीय पोस्ट टाकून चर्चा करू नये असे म्हणतात. कंपनीत कार्यालयात आपण कामगार कर्मचारी अधिकारी आहोत पण बाहेर तर आपण मतदार, नागरिक, कोणत्या तरी समाजाचे आणि वैचारिक पक्षाचे समर्थक असतोच नां?.मग त्यावर मत व्यक्त करण्यात काय वाईट आहे,शेवटी प्रत्येकाचे विचार स्वातंत्र्य अबाधित आहेच,इतरांनी व्यक्त केलेले मत पटलं पाहिजेच ही अपेक्षा नसावी. विज्ञानवादी कंपनीतील कामगार, कर्मचारी अधिकारी वर्गाने अज्ञानी असता कामा नये, सद्विवेकबुध्दी सर्वच ठिकाणी वापरी पाहिजे,कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन कॉम्पुटर, पी सी ओ,झेरोक्स मशीन, प्रिंटर,स्मार्ट मोबाईल,देशातील आणि जगातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्या बाजारात एकापेक्षा एक लॅपटॉप ऑफर करत असतात. आजकाल लॅपटॉप गरजेचा झाला आहे. शाळा-कॉलेजचे क्लासेससाठी लॅपटॉप अत्यावश्यक बनला आहे. आणि यामुळेच गेल्या काही दिवसात लॅपटॉप्सची मागणी देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात उपलब्ध काही चांगल्या लॅपटॉप्सबद्दल माहिती देत असली पाहिजे. आपण वापरण्यापूर्वी त्यांची टेस्टिंग करतो. त्यातील प्रत्येक भागाची क्षमता, चेकिंग करून पाहतो. नंतर त्यांची सर्विस कशी आहे हे पाहतो. मग विकत घेतो की नाही. मग आपण आपले कुटुंब,जिथे राहते ते नगर सोसायटी,विभाग तेथील सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती यावर चर्चा केली आणि अज्ञान दूर करून सज्ञान झाले तर काय वाईट आहे?

मित्रांनो सोशल मिडिया हा फक्त मित्राचा ग्रुप नसतो. तर एक खुले व्यासपीठ असते. त्यात आपल्याला माहिती असलेली माहिती मित्रांना देऊन सावध करता येते.मित्रांचे त्याच्या कुटुंबाचे रक्षण स्वरक्षण करता येऊ शकते. जर रेल्वे स्टेशन बाहेर राजकीय कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, जाळपोळ केली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली तर आपण काय केले पाहिजे? ही विचारांची देवाणघेवाण आहे, चर्चा आहे त्यात व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये, तुम्ही तुमचे कुटुंबातील सदस्या काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे किंवा अन्य कुठल्याही पक्षात असतील. जात धर्म भाषा प्रांत म्हणून कोण्या एका पक्षाचे समर्थन करत असाल त्यात काहीच गैर नाही. तो तुमचा अधिकार आहे.ती तुमची पसंती आहे.त्या बद्दल कोणाचे काहीही म्हणणे नाही.परंतु माझ्या मराठी बांधवांनो अहो ज्या मातीत तुम्ही जन्मले आहात. त्या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या आजोबा पणजोबांनी राख मिसळली आहे. ती तुमची महानगरी महा राष्ट्र आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभुमी आहे. ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त या मातीत सांडले आहे. त्याच मराठी भाषिक राज्याचे कोणी तुकडे पडण्याचे स्वप्न पाहत असेल तर? आपण शांत बसून राजकारण पाहत राहणार काय?त्यासाठीच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात हवी होती. तीच आता पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे रिक्षावाला वाहन चालक,टपरीवाले,नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पापमुक्त होण्यासाठी करीत आहेत. आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम करीत आहे. ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी बलाढ्य शिवसैनिकांची शिवसेना एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.आम्ही शिवसेनेच्या हिंदुत्वादी विचारांचे विरोधक होतो.

आणि आज ही आहोत. पण मराठी माणसांच्या स्वाभिमानी जगण्यासाठी महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरेंनी स्थापना केलेली शिवसेना आज ही हवी आहे.अन्यता हे ब्राम्हण बनिया जातभाई मुंबई सह महाराष्ट्र गिळकृत कारणासाठी १९६० साला पासून टपून बसले आहेत. पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे आमदार खासदारांनी स्वार्थासाठी शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरुंग लावत आहेत. हे मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी खूप वेदनादायक आणि भविष्यासाठी प्रचंड नुकसान करणारे आहे.

मोरारजी देसाईचे स्वप्न मराठी माणसांनी प्रचंड जनांदोलन करून १०६ हुतात्मानी उधळून लावले.तेव्हा पासून गुजरातचे गुजर मारवाडी बनिया ब्राह्मण आपल्या राज्यातील उद्योग धंदे गुजरात कडे घेऊन जाण्याचे प्रयत्न करीत होते. त्याला मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत होती.तीच आमदार कट्टर शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने करीत आहेत.देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच्या नियोजनबद्ध योजनेनुसार राज्यातील उद्योग धंदे गुजरातला पळवत असतील तर त्या कृतीचा मराठी माणसांनी पक्ष संघटना विसरून विरोध केलाच पाहिजे.आर एस एस प्रणित संस्था संघटना आणि भाजप पक्ष यांच्या हिंदुत्वादी मराठी माणसांना मोदीच्या निर्णयाचा विरोध करायचा नसेल तर तो त्यांनी करू नये. पण महाराष्ट्रात त्यांना भविष्यात राजकारणात किर्याशील राहायाचे आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राट जिवत असते तर त्यांनी कट्टर शिवसैनिकांना आदेश दिला असता “जिथे दिसतील तिथे तुडवा” त्यांची अंमलबजावणी शिवसैनिकांनी ताबडतोब केली असती. महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ हिंसक झाला असता. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगाडली असती आणि हे शिवसेनेशी गद्दारी करणारे घराच्या बाहेर पडले नसते त्याच बरोबर यांना फितूर करणारे रात्री तोंड लपूनछपून फिरणारे सुद्धा दिवसा फिरण्याची हिंमत करू शकले नसते.याचा भाजपा समर्थक मराठी माणसांनी मतदारांनी विचार केला पाहिजे.

भाजपा समर्थक मराठी मतदारांनी आज लक्षात घ्यावे की आज त्यांचे समर्थन करत असाल तर उद्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही ते गुजरातला घेऊन जातील.कारण त्यांना माहीती आहे. आपण कीतीही चुकीचे केले तरी आपले भक्त आपले समर्थनच करतील.माणुस किती ही वाईट आणि किती ही निच मनोवृत्तीचा असला तरी काही ही झालं तरी तो आपल्या घराचा राज्याचा देशाचा चांगलाच विचार करतो.परंतु आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी तर लोकलज्जा शर्मच सोडली आहे. ज्या भाजपाला महाराष्ट्राने १०५ आमदार व २२ खासदार दिलेत ते १०५ आमदार व २२ खासदार सुध्दा आपल्या राज्याचा विचार करत नसतील तर यांना मतदारांनी धडा शिकविला पाहिजे.

वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्याने आपल्या राज्याचे १,५४.००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प राज्यात यावा यासठी अनेक प्रयत्न केले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग आणि एम.आय.डी.सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन यांच्यासह मंत्र्यांनी खूप वेळा कंपनीच्या अधिकाऱ्या भेटा घेऊन सोबत बैठका घेतल्या होत्या. वेदांत फॉक्सकॉर्न कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथे जमिनीचे सर्वेक्षण सुद्धा केले होते. हीच जागा संपूर्ण देशातील सर्वाधिक कशी उपयुक्त आहे हे म्हटले होते. २१ जून २०२२ रोजी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता बदल घडविण्याच्या घडामोडी झाला नंतर विधानसभेच्या अधिवेशनात तशी अभिमानाने घोषणा केली होती.वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रात होणार निश्चित असतांना अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेबर २०२२ रोजी वेदांत समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि ८ दिवसाच्या आत १३ सप्टेंबर २०२२ रोजी हा प्रकल्प गुजरातला मिळाला. त्यामुळेच महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायामुळे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय कार्यकर्ता, नेता आणि मराठी माणूस पेटून उटला पाहिजे होता.पण तो कुठे ही तो दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज क्षणा क्षणाला आठवण येते. मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात होती ती आता संपली. ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. शेवटी इतिहासात मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली? असा प्रश्न विचारला जाईल.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९