बुद्ध धम्म आणि संघ आचरणात न आणणारी गर्दी!

30

संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटातुन बाहेर पडले आहे.त्यामुळे सर्व उत्साहावर पडलेले पाणी आता पूर्णपणे वाहून गेले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकार यांनी सम्राट अशोक धम्म विजय दिनाच्या विजया दशमी दिनी धम्म क्रांती करून जगात नवक्रांती घडविली त्याला यावर्षी ६६ वर्ष पूर्ण होत आहेत.दोन वर्ष धम्मक्रांती जगभर उत्साहाने घरा घरात साजरी झाली.त्यांची गिनीज बुकवाल्यांना नोंद घ्यावी लागली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटालुन हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती. ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या पूर्णपणे न स्विकारल्यामुळे तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो. म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकार यांची धम्मक्रांतीमुळे समाजात मोठा बदल अपेक्षित होता. तो झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झाला नाही असे ही म्हणता येत नाही. लोकांना उत्सव महत्वाचा वाटतो.विचार आणि त्यानुसार आचरण नाही.हे दिक्षाभूमी वरील गर्दीने आणि कार्यक्रमातून दिसून येते. ज्या भूमीवर २२ प्रतिज्ञा घेतल्या त्याच भूमीवर २२ प्रतिज्ञाचे आचरण करणाऱ्या कडून काय संदेश दिला जातो.यांचे आत्मचिंतन साहित्यिक विचारवंत करतांना दिसत नाही.

भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. तोच खरा धम्मोधर असतो. धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुले आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही. बुद्ध पौर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण, उत्सव आहे. त्याच पद्धीतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या नागपूरच्या भूमीवर धम्म दीक्षा घेतली म्हणूनच ती आज जगात दिक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते.त्यामुळेच नागपुरातील रहिवाशांचे आचरण महत्व लक्षवेधी असले पाहिजे. ते जागतिक कीर्तीच्या भिक्खू संघाला शरण न जाता.आर एस एस च्या पिलावळीला शरण जात असतील तर त्यावर जगभरात चर्चा होणारच आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्धगया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा सांगितले.आणि त्याच पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा.शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करा. या दोन महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.म्हणूनच बुद्ध धम्म आणि संघ आचरणात न आणणारी गर्दी दीक्षाभूमीवर दरवर्षी दिसते.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारावर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल,तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. याची आठवन आपल्याला अन्याय अत्याचार व हत्याकांड झाल्यावरच येते. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही. ते म्हणतात संघ बडा बलवान संघ करेगा सबकी रक्षा क्यो की संघ बडा बलवान.हे लक्षात न घेतल्यामुळे बुद्ध धम्म आणि संघ आचरणात न आणणारी गर्दी दरवर्षी वाढतांना दिसते.

धर्मांतरीत आंबेडकरी समाज, संघ, संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही. म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.हे रिपब्लिकन आणि आंबेडकरी समाजाला कोण सांगेल?.पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते. युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेऊन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. त्यांनाच मुख्य कार्यक्रमाला प्रमुक पाहुणे, वक्ते मार्गदर्शक म्हणून बोलवायचे. आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडल्या नंतर टीका टिपण्णी करत बसायचे. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही. ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील. तुम्हाला समता, स्वत्रंत, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल. केवळ गर्दी करणारे उत्सव साजरे करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर उत्सव साजरा करण्याचा अर्थ काय?

माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळी कोण सांगेल?. बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे. संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती. पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदामुळे बंद असतात. त्यामुळेच नागपूर, मुंबई भिमा कोरेगांव, महाड, येवला या ठिकाणी बुद्ध धम्म आणि संघ आचरणात न आणणारी गर्दी दरवर्षी वाढत चालली आहे.असे मी लिहले तर चुकीचे ठरेल काय?

श्रीलंका, थायलंड, बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात.तिथे शिस्तबद्ध आचरणात सर्व व्यवहार होतात. एक दिवस विशेष कोणताही उत्सव साजरा करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणा साठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो.मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो. आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन दीक्षाभूमीवर माथा टेकवणाऱ्या तमाम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध बांधवास ६६ व्या धम्म क्रांती विजय दिना निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना.हिच दीक्षाभूमीवरून घरी गेलेल्या सर्वाना नम्र विनंती, आणि हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई)मो:-9920403859