खाजगी बस व आयशर टे्ृलर अपघातात अकरा जणांचा होरपळून मृत्यू

69

🔹मुख्यमंञी शिंदेनी केला शोक व्यक्त- मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.8ऑक्टोबर):-नाशिक शहरात नांदुरनाका परीसरात नाशिक औरंगाबाद राज्य महामार्ग हाॅटेल मिरची जवळ चिंतामणी ट्व्हल्स खासगी बसला लागलेल्या आगीत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे हृदयद्रावक घटना आज पहाटे घडलीआहे. मिरची हॉटेलजवळ येथील चौफुलीवर पहाटे ४.४५ वाजता ही घटना घडली आहे.ट्रेलर व बसमध्ये हा अपघात झाला. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली.ही घटना झाल्यानंतर अनेक प्रवाशी झोपेत होते.स्लिपर कोच असल्यामुळे अनेक प्रवाशांना उठण्यास वेळ लागला.काही प्रवाशी उतरले.यातील जखमी प्रवाशांना शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. या बसमध्ये ३० प्रवाशी होते. ही गाडी चिंतामणी ट्रॅव्हल्सची असल्याचे सांगण्यात आले.पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले या दुदैवी अपघातामध्ये आगीत बस जळून खाक झाली आहे.

औरंगाबाद रोडवर मिरची हॉटेल चौकात पाहटे बस व आयशर ट्रक चा अपघात झाला असून ११ प्रवासी आणि बस चालक जळून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.बस मध्ये तीस प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात एवढा भीषण होता की आयशर ट्रकची डिझेल टाकी अपघात झाल्यावर फुटली व स्फोट झाला.पहाटेचा वेळ असल्याने अनेक प्रवासी झोपेत होते त्यामुळे प्रवासाना बाहेर निघण्यास वेळ मिळाला नाही मृत्यूचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौकात हा अपघात झाला असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय हॉस्पिटल येथे आणण्यात आले आहे. नाशिक शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.अधिक तपास पोलीस करित आहेत.नाशिकच्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दखल घेत शोक व्यक्त करित पाच लाखाची मदत जाहिर केली.

नाशिकमध्ये घडलेल्या मोठ्या बस दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. खासगी बसला भीषण आग लागून ११ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने जिल्ह्याधिकारी गंगाधर डी आणि पोलीसआयुक्त नारनवरे यांचेशी फोनवर बोलणे केले आहे.या घटनेत ११ जणांचा मृत्यू तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना शिदे याच्या सह केन्द्रीय राज्य मञी भारतीताई पवार,पालकमंञी दादा साहेब भुसे यांनीदिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत.उपचारात काहीही कमी पडू देऊ नका, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला प्राधान्य द्यावे, अशा सुचना दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले. ही बस मुंबईकडून यवतमाळकडे जात होती. त्यावेळी एका टँकरला धडकल्यामुळे बसला आग लागल्याची घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी असणाऱ्यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्वत: महापालिका व पोलिस आयुक्त हजर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. याबाबतअधिक तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त नार्वे यांनी सागितलेआहे