बोरी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

34

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.15ऑक्टोबर):-तालुक्यातील बोरी (चा) ता. उमरखेड यवतमाळ येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव माने यांच्या शेतात बैल चरत असताना शुक्रवारी सायंकाळी चार वाजता च्या दरम्यान अचानक परतीचा पाऊस पडला. त्याचबरोबर विजेचा कडकडाटात सुरू होता. त्यातच बैलावर एक वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला.

सोयाबीन पिकाची अतोनात नुकसान झाले त्यामध्ये मेटाकुटीला आलेला शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्याचे संसाधन बैलजोडी त्यामध्येच बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी हातबल झाला.

पुढील शेतीचे काम कसे करावे हा यक्षप्रश्न शेतकर्यां समोर उभा राहिला त्या बैलाची अंदाजे किंमत 60,000 (साठ हजार रुपये) होती. व त्याची उणीव कशी भरून काढावी तर सर्वांचा मायबाप शासनच आहे.या बाबीकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी.अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून होत आह.

याकडे उमरखेडचे शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार साहेब यांनी लक्ष घालावे अशी विनंती बोरी येथील शेतकरी करत आहेत.