चिमूर तालुक्यातील 45 शाळा होणार बंद-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून तीव्र विरोध

29

🔸शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या- श्रीहरी सातपुते

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे, या शाळा शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला, तो अन्यायकारक निर्णय रद्द करून जनतेचा असंतोष कमी करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांचे मार्गदर्शनात चिमूर शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

ग्रामीण भागातील वर्ग एक ते चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वय फार कमी असते, त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाताना ग्रामीण भागात जाण्या येण्याची सुविधा नसते. अश्यावेळी शाळा बंद केल्या तर ते शिक्षण घेणार कसे? त्यातच चिमूर तालुक्यातील एकूण 45 शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे, या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य पुढील काळात अंधकारमय होणार आहे, ते शिक्षणापासून कोसो दूर राहतील.अश्या वेळी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, जर असे झाले नाही तर ग्रामीण भागातील जनता विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशारा चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने श्रीहरी सातपुते यांनी उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे उपस्थित निवेदाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक कमलाकर बोरकर, तालुका समन्वयक देविदास गिरडे, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल डगवार, उपतालूका प्रमुख केवल सिंग जुनी, माजी तालुका प्रमुख सारंग दाभेकर, तालुका संघटक रोशन जुमडे, शहर प्रमुख सचिन खाडे, माजी विभाग प्रमुख संतोष कामडी, देवा मसराम, समीर बल्की, प्रफुल कमाने, प्रसिध्दी प्रमुख सुनील हिंगनकर, सह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते