रेशनच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 14 नोव्हे सोमवार ला उमरखेड येथे धरणे

28

🔸मुव्हमेन्ट फॉर पीस अँड जस्टिस चे तहसील कार्यालया समोर धरणे

🔹तक्रारकर्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.12नोहेंबर);-मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर ही सामाजिक संघटना मागील सतरा वर्षांपासून गरीब रेशन कार्डधारक जनतेच्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर कार्यरत आहे .तसेच जनतेच्या प्रश्नावर जनहित याची काही दाखल केल्या आहेत.देशात अन्न सुरक्षा विधेयक 2013 लागू आहे महाराष्ट्रातील सात कोटी 16 लाख जनतेला रेशन मिळण्याचा कायदेशीर अधिकार मिळालेला आहे.

सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन सतत परिपत्रके काढून प्रशासनाला सूचना आदेश देत असते परंतु महाराष्ट्रात 1999 पासून वार्षिक 15 हजार उत्पन्न मर्यादा ही दारिद्र्यरेषेची अशास्त्रीय व्याख्या अद्यापही लागू आहे .तसेच अन्न सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी 2013 मध्ये ठेवण्यात आलेले ग्रामीण वार्षिक 44 हजाराच्या आत व शहरी 59 हजाराच्या आत उत्पन्न असलेली उत्पन्न मर्यादा ही वाढत्या महागाई समोर चुकीचे आहे .याचा फायदा घेऊन दुकानदार कार्डधारकांना धमकावीत आहेत.

त्यामुळे कोणीही कार्डधारक तक्रार करायला पुढे येत नाही तसेच भ्रष्ट अधिकारी यांच्याबरोबर संगणमत करून काही ठिकाणी तक्रारदार कार्डधारकांची रेशन बंद करण्यात येते. शिवाय इतरही अनेक समस्यांना कार्डधारकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे.

शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.त्यामुळे रेशनच्या प्रश्नावरील खालील नमूद मागण्यासाठीधरणे आंदोलन करण्यात येत आहे.

कार्डधारकाच्या मागण्या पुढील प्रमाणे 1 – एक अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत मिळणारे धान्य व प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य ई – पॉस मशीन मधून मिळणारी पावती कार्डधारकांना मिळाली पाहिजे . या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.
अन्यथा दोषी दुकानदारावर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात यावेत.
2 -सर्व पात्र लाभार्थ्यांना यांच्या रेशन कार्ड वर पात्रतेचे शिक्के व बारा अंकी आरसी नंबर लिहिण्याची मोहीम राबविण्यात यावी.
3 – रेशन दुकानावर दुकानाचे वेळापत्रक सुट्टीचा दिवस व तक्रार कुठे करावी याबाबतचा बॅनर लावण्यात यावा.
4 -किमान 250 कार्डधारकांना दुकानात धान्य आल्याची माहिती / सूचना एस एम एस द्वारे देण्याच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.
5 – प्रत्येक महिन्यात रेशन दुकानावर अन्न दिवस साजरा करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
6 – तहसील/पुरवठा कार्यालयात नागरिकांची सनद म्हणजे कार्यालयात मिळणाऱ्या सेवा त्यासाठी लागणारा, संबंधित जबाबदार व्यक्तीचे व काम न झाल्यास तक्रार कुठे करावी ,याची माहिती फलक लावण्यात यावे.
7 – रेशन कार्ड असलेल्या पण धान्य मिळत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ देण्यासाठी इष्टांग वाढविण्याच्या दिशेने प्रशासनाने प्रयत्न करावे.

वरील मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोरील दिनांक 14 नोव्हेबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजे पर्यंत एक दिवसीय लक्षवेधी धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात कार्यालयात तसेच संघटनेकडे तक्रारी दिलेल्या कार्डधारकांनी तसेच ज्यांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.

अशा सर्व नागरिकांनी या लक्षवेधी धरणेआंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेतर्फे एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष अन्सार हुसैनी कार्याध्यक्ष डॉ. फारुक अबरार यांनी केले.