बिहारच्या धरतीवर राज्यात ओबीसीची जनगणना करा-सूदर्शन बोराडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

95

✒️लातूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

लातूर(दि.12जानेवारी):- बिहार राज्याने जात जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केली आहे. याच धरतीवर महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय स्वातंत्र्य जनगणना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केलेली आहे यासंदर्भात त्यांनी आज निवेदन ही जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत पाठवण्यात आलेली आहे बिहारमध्ये स्वतंत्रपणे जतनिहाय जनगणना सुरू झाली आहे.

तामिळनाडू छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यात सुद्धा ओबीसीची जनगणना केल्या असून त्यांना राजाच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झाला आहे. महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करण्याबाबत आमची गेल्या कितने दिवसापासून मागणी प्रलंबित आहे जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे .मात्र इतर मागासवर्गाची स्वातंत्र्य जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकार प्रमाणे ओबीसीची स्वातंत्र्य जनगणना करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने केली आहे.